श्री विठ्ठल - एकादशी या महान महत्वाच्या दिवसाचा अर्थ काय? प्रथम सेवेकर्यांने सत बनण्याचा प्रयत्न करणे. पूर्व संचिताप्रमाणे मानवाने, सेवेकऱ्याने सत् बनण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु तत्त्व कोण आहे? ज्या आकाराला आपण शरण आहात, ते जे तत्व बहाल करतात, चुकलेली जागा दाखवतात, त्यांच्या ठिकाणी रममाण होणे, दहा इंद्रियांचा संयम करून एकाग्र करणे व अकराव्यात लय करणे.…
श्री विठ्ठल - दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे ते…
ही प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी त्या पात्रतेला अजून गेलेले नाहीत. पण मला लाघव करण्यासाठी चांगला वाव मिळतो, म्हणून ते कर्तव्य मी माये कडून करून घेतो.
मी करूनही अकर्ता ! सुखदुःखाच्या वेगळा आहे. वेगळा असून सुद्धा पाप पुण्याच्या निराळा आहे. सर्व…
श्री समर्थ मालिक - आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो. म्हणजे आकार दृष्य झाला असे वाटते, कोणाला अन् नाही कोणाला? स्थानवंत आहे, त्या अर्थी आकारी आहे. आकारी असून निराकारी आहे त्याचा ठावठिकाणा नाही.
मी कोणीही नाही, मी निमित्त मात्र आहे. असे जरी म्हटले तरी एक तत्त्व…
बोलांची टोचणी करून अजूनही सेवेकरी सागरातल्या जलाप्रमाणे होत नाहीत. हो ! पण सागरातील जल खारट असते. प्रत्येक सेवेकरी खारट झाला, तर कसे जमणार? पण त्या सागरासारखे तरी सेवेकरी आहेत का?
भक्ती ही साधी, सोपी अन् सुलभ आहे. पण त्या भक्तीची लाज राखणे दुरापास्त आहे. भक्तीला तेज आणणे सेवेकऱ्यांच्या हातून होत नाही, म्हणून सेवेकरी फसतो.…
श्री समर्थ मालिक – प्रवचन म्हणजे काय? परांचे वचन, त्यांचे बोल ! ते ऐकण्याची इच्छा म्हणा. सेवेकऱ्यांची महान इच्छा असते प्रवचन ऐकण्याची, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालले आहेत का? आदेश मानले आहेत का? मनात रुजू करून घेतले आहेत का?
सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही, मग तुम्हाला सांगून ते करून…
दिनांक: २० जुलै १९७२ सेवेकरी विष्णू कदम - अचानक झालेल्या घटनेमुळे फारच वाईट वाटते. स्थूलात राहण्याची इच्छा होती, पण समर्थ इच्छेने जे काय होईल ते फार चांगले असते. सेवेकर्यांनी इच्छा दर्शविली की तो मायावी गतीने जातो. समर्थ इच्छेने जे होते ते हितकारक असते. म्हणून मी इच्छा काय आहे ते सांगत नाही. सानिध्यात असताना ही गती…
श्री समर्थ मालिक – || तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न ||
मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात. मग सेवेकरी अभिन्न का होत नाही? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये?
ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला नाही. त्यांने सताचे…
श्री समर्थ मालिक - अनेक वेळेला प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा याची ओळख होऊ शकते. पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही. गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा, किती फरक पडतो याचा सेवेकर्यांनी विचार करा. हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहता म्हणजेच द्वैत भावनेने…
श्री समर्थ मालिक –तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || ज्या वेळेला तुकोबांनी हे बोल फेकले त्या वेळेला त्यांनी किती तीर्थे केली होती? काशी, गया, प्रयाग वगैरे त्यांनी तीर्थे केली का? मग तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || आधीच मन मुंडा | मगच ब्रह्म धुंडा || ज्याने मन मुंडा केले नाही, त्याला…
श्री समर्थ मालिक - सर्व सेवेकरी पूर्व संचिताप्रमाणे या आसना सानिध्यात घेतले आहेत, मग हेवे दावे कशासाठी? याचा विचार तुम्ही करा. यानंतर मात्र हेवेदावे नकोत. आसनाधीस्त हे तत्त्व साधे सुधे नाही. ते कोणाकडून काहीही करून घेतील, ते कोणाला कळेल का? मग सेवेकऱ्यांचे मन गढूळ का? मनात शंका का? अन् कशासाठी? त्यांनी जे बीज पेरले ते…
श्री समर्थ मालिक - या नामावर श्रद्धा राहणे कठीण आहे. कोणी म्हणतो, ती हवा आहे. ती गेली म्हणजे सर्वस्व कारभार आटोपला, पण हवेत किती अर्थ आहे. त्यात किती सामर्थ्य आहे, हे पाहण्याचे मानवाचे सामर्थ्य नाही.
मानव हा मानाला हपापलेला आहे. क्रोधाने बरबटला आहे. मग, त्याला या नामाची गती कशी मिळणार? जो मानव अहंकाराने बरबटला, मी…