श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज - परिमळ कसा असतो तर अत्यंत निर्मळ! परिमळ म्हणजे सुवास, सुगंध कसा असतो? परंतु ही माया निर्मळ असते का हो? म्हणून सद्गुरु सांगतात या मायेत गुंतून राहू नकोस. सर्वस्व सत चरणावर अर्पण कर, अर्थातच सतमय हो. द्वैत दूर केल्याशिवाय तुला अद्वैताचा अनुभव येणे शक्य नाही. अद्वैत झाल्याशिवाय एकचित्त …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज - सद्गुरुंचा सेवेकर्यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सेवेकऱ्याची आहे. एखादा सेवेकरी विचित्र तऱ्हेने जाऊ लागला, वागू लागला तर मात्र सद्गुरु त्यावर नाराज होतात. पण सेवेकऱ्यासाठी सद्गुरु सदैव खालीवर होतात. त्यांच्या मनात सेवेकऱ्याबद्दल तळमळ असते. …
Oplus_16908288
सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रणवांप्रमाणे आपण मार्गस्थ झालात तर सद्गुरूंना देखील मनोमन समाधान वाटते, पण जर हेच त्या अमृततुल्य बोलांकडे दुर्लक्ष केले तर सद्गुरूंना काय वाटेल? आणि जर सेवेकऱ्यांना कोणताही त्रास होऊ लागला, त्यांच्यावर कोणता प्रसंग…
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज - सेवेकऱ्यांनो तुम्हीच सांगा भक्त आणि भगवंत एक आहेत का हो? जर भगवंतच भक्ताच्या हृदयात वास करीत आहेत तर ते वेगळे असू शकतील का? परंतु आम्हाला काय वाटते "भगवंत वेगळा आणि मी वेगळा".
आपल्यात ते वास करणारे जे अविनाशी तत्व आहे त्यालाच आत्मा म्हणतात. आपणाला कल्पना आहे की…
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज - मनाचे मी तू रहीत होणे याचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकेल का? आणि कोणी असे म्हटले आहे की मी आता मी-तू रहीत झालेलो आहे. तेव्हा कसे आणि कधी ते मनाला टिचकी मारतील ते कळणार नाही. हे कळण्याची, समजण्याची, जाणण्याची सेवेकर्यांनो तुमची कुवत नाही. कारण त्या अनंत…
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज - एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो,”सता आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे, माझ्याकडे अर्पण करण्यासारखे आता काहीच उरले नाही, अनंता जर काही शिल्लक असेल तर ते…
दिनांक:- १ जुलै १९७६
जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव । तेणे आत्मस्थिती जाणीतसे।
श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज - द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतू रहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टी ज्या मानवाच्या मनाजवळ आहे तोच मानव अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो, अशी स्थिती जाणून…
श्री समर्थ मालिक - मनात तरंग येत असतील तर सद्गुरुंची आठवण करा. मी कोणाशी वादविवाद करतो, कोणाची मस्करी करतो, हे सेवेकर्यांनी करु नका म्हणजे आपुलकी लवकर निर्माण होईल.
आसनाधिस्तांनी कोडकौतुकाने सांगितले आहे सर्व माझेच आहेत आणि मी सर्वांचा आहे. अशा तऱ्हेने कर्तव्य केले तर कोण कोणाची विटंबना करेल काय? म्हणून मन मिळावूपणाने सेवेकऱ्याने वागावे.…
श्री समर्थ मालिक - मी नाही असा रिकामा ठाव नाही. संतांनी वर्णन केलेले आहे की, भगवंता शिवाय वृक्षाचे पानही हलत नाही. पवन सुटत नाही. पर्जन्य पडत नाही. सर्वस्व माझ्या सत्तेने होते. असे जर आहे, तर सेवेकर्यांनी आपल्या हृदयात याची खूणगाठ का बांधू नये? मी तू रहित का होऊ नये? मी तू रहित झाल्यानंतर सर्वांचे मन…
श्री समर्थ मालिक - मनमिळाऊपणा
मनमिळावूपणा म्हणजे काय? मन हे केवढे आहे? किती मोठे, किती बारीक आहे? पकडले तर सापडते कां? मन कोठून व कोणापासून आहे? मन म्हणजे काय? ते दिसते काय?
मन म्हणजेच माया ! माया दिसते कां? दिसे ते मायावी कसे? तत्व जे असे ते अविनाशी ! माया हि दिसते कां? तसेच मन…
श्री समर्थ मालिक - आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल.
या दरबारातील सेवेकरी अप्रकाशित नाहीत. अप्रकाशित म्हणावे तर ते बसल्यानंतर रममाण होतातच ! म्हणून अप्रकाशित म्हणता येणार नाहीत. पण जी गती पाहिजे, ती अजून मिळालेली नाही.
कांही सेवेकर्यांनी पाठीमागे विचारले…