श्री समर्थ मालिक - मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच का असतो? सद्गुरु चरणांत तादात्म्य झाल्यानंतर, मी त्या ठिकाणी उभा असतो. कारण ती भक्ती निष्काम असते. फक्त त्या ठिकाणी भक्ताची दर्शनाचीच इच्छा असते अन् म्हणून त्या ठिकाणी मी जातो.
मी योग्यांच्या ठिकाणी…
श्री समर्थ मालिक - सर्वस्व भारतभूमीवर अंध:काराची छाया पसरलेली आहे. सर्वस्व अंध:कार दाटला आहे. याचे कारण कारभार आहे. सेवेकरी जे स्वयं प्रकाशात नांदतात, त्यांनी चिंता करावयाची आवश्यकता काय? त्यांनी चिंता करावयाची नाही.
आज जवळजवळ किती वर्षे हे चालले आहे? आराखड्याची माहिती अजून दिली नाही आणि मिळणारही नाही. हे तुम्हाला माहित की मला माहित?
यज्ञ…
श्री समर्थ मालिक - सर्व समर्थमय करावयाचे असेल तर संसार नेटका केलाच पाहिजे. ज्याचा संसार नेटका नाही, ती ज्योत गतीमान होणार नाही. शांती मिळणार नाही. माया आणि ज्योत यामधील संघर्षात जी ज्योत आहे ती स्थिर होऊ शकते, पण जोपर्यंत ती मायेला स्थिर करीत नाही, तोपर्यंत स्थिर होईल कशी?
जोपर्यंत सत् ओळखले नाही, तोपर्यंत…
श्री समर्थ मालिक - जी भक्ती आपण करतो, ती कशासाठी? तर जो मानव करील त्याच्याचसाठी ती आहे, अन् ती भक्ती त्याच्याच बरोबर असते. दोन्ही उभयता जरी असलात तरी नवऱ्याने केली ती बायकोला नाही, अन् बायकोने केली ती नवऱ्याला नाही.
आता सांगा, या दरबारात एकाच घरात एकाच कुटुंबात किती सेवेकरी आहेत? त्यांचीच वळणे पहा.…
श्री समर्थ मालिक - नाही वैकुंठीचे ठाई | नाही योगीयाचे हृदयी || माझे भक्त गाती ठाई ठाई | तेथे तिष्ठामी नारदा ||
आताचे भक्त आहेत त्यांना नारदा सारखे सर्वस्व बहाल करावे का? अन् ते नारदा सारखे होतील का? नारद ही साधी सुधी ज्योत नाही. त्याचा तंबोरा याच आसनावर घेतलेला आहे नाश?
भक्ती का…
श्री समर्थ मालिक - सत् आणि असत या दोन्हींचे घर्षण होऊन सतावर असणारे असताचे दडपण दूर करण्याकरिता काही तरी केलेच पाहिजे. असताचा नाश करताना सताला थोडीशी झळ लागेल. ती सहन करण्याचा प्रयत्न करावा. अघोर निपटल्याशिवाय महाराष्ट्र शुद्ध होऊ शकत नाही. इतकेच काय, मानवाला एक पाऊल टाकल्यानंतर दुसऱ्या पावलाला काय करतो हे कळत नाही. बोलायचा…
श्री विठ्ठल - वनवा लागल्यानंतर सुक्याबरोबर ओल्यालाही झळ लागते. तशी झळ लागेल. ओला वृक्ष आहे त्या ठिकाणी गारवा लागतो. तसा सेवेकऱ्याच्या ठिकाणी गारवा असेल तर त्याला त्रास होणार नाही. महाराष्ट्राची पुढे फार उज्वल तऱ्हा आहे. ज्ञानेश्वरांच्या संदेशाप्रमाणे हे सर्व चाललेले आहेत.
हल्लीच्या काळी असे भक्त नाहीत. आर्यवर्ताचा काळ असा नव्हता. त्यावेळी त्यांनी जडत्व…
श्री समर्थ मालिक - नाही, मी लहान नाही, मी मोठा असा मी आहे. म्हणाल तसा मी आहे. सेवेकऱ्याच्या पात्रतेप्रमाणे सर्व घडत असते. मात्र सेवेकऱ्याने त्याप्रमाणे वाटचाल करावी हे संदेश आहेत. एकच खुणगाठ बांधणे कि ज्या आकाराला मी शरण आहे, त्याला विसरू नये. ज्या आकाराने खूण दाखविली, त्यांचे दर्शन मिळाले पाहिजे.
ज्या आकाराला शरण…
श्री समर्थ मालिक - नामस्मरण हे साधे सोपे नाही. रस्त्याने चालला तरी लहर लागली पाहिजे. लहर लागली तर पावलोपावली चमत्कार करीन. पण सेवेकरी त्याने हुरळून जाईल. परंतु सेवेकर्याची मनोभावना तशी झाली, तर हे करावे लागते.
सर्व सूत्राची दोरी माझ्या आधीन आहे. काही डोळस आहेत, काही नादातीत आहेत. डोळस म्हणजे सानिध्यात घेतलेले, नादातीत म्हणजे…
श्री समर्थ मालिक - मागील आदेशाप्रमाणे वरचेवर घडत आले आहे यात शंका नाही. येथून पुढे काय होईल हे सांगता येत नाही. उ:षापाचा काळ संपत आला आहे. आणखीन काही दिवस त्रास होईल, पण सेवेकर्यांनी बिलकुल घाबरू नये. तिजोरी दिली आहे, तिची जोपासना करणे.
हल्ली ठिकठिकाणी अनुभव मिळत आहे. संकटाच्या वेळीच मानवांना माझी आठवण होत…
श्री समर्थ मालिक - “सगुनाचा सार घेणे यातच सर्वस्व आहे.”
संसारात राहूनच कोणाचे कृपेने हे चालले आहे, कुणाच्या कृपेने हे करतो आहे, हे ज्याला समजले, ज्याने जाणले तो कुठेही भिक्षा मागावयास जाणार नाही, पण अशी कृती होणे कठीण आहे. हे सर्वस्व समर्थांचे आहे, त्यांच्याच कृपेने मी कर्तव्य परायण आहे, कर्तव्य करतो आहे, अशी ज्याची…
श्री समर्थ मालिक - एकाचे सख्यत्वासाठी | पडाव्या जिवलगांसी तुटी ||सर्वही अर्पावे शेवटी | प्राण तोही वेचावा ||
एकाच्याच (ते एक म्हणजे आपले सद्गुरु) त्यांच्या ध्यानासाठी, एकाच्याच (त्यांच्या) नामासाठी, एकाच्याच (सद्गुरुंच्याच) सख्यत्वासाठी ते कसे करावयाचे? त्यांना आपलेसे कसे करावयाचे? हे जर गुह्य सापडले तर आपसात हेवेदावे, मदमस्तर निर्माण होईल का? एकाच तत्त्वावर ठाम राहिला,…