Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

….पापाचे खंडन होईल का?©️

श्री विठ्ठल - साधा भोळा चोख्या, तो कुठे तीर्थ करायला गेला होता? त्याने लिखाण केले आहे ना? तो बराच शिकलेला होता का? मग आता शिकलेल्यांनी सांगा, आताचे भक्त कसे आहेत? तुकोबाने, जनाने, नामदेवाने कोणत्या तऱ्हेने भक्ती केली? पापाचे घडे कसे धुतले जातात? तर नामानेच जातात ना ! याचे संतांनी वर्णन केले आहे.…

Read More

विठ्ठल कुठे आहेत…©️

श्री विठ्ठल - काही लोक मूर्तीच्या दर्शनासाठी लोकांचे सोटके खातात. काही तर पुढे पण येत नाहीत. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जास्त गर्दी असते. धक्का बुक्की होते, मार खावा लागतो. पण विठ्ठल कुठे आहेत, हे कोणी पाहिले आहे का? मग जर हे कळत नाही, मग माळा घालण्यात अन टिळा लावण्यात अर्थ तरी काय आहे? उपयोग काय?…

Read More

अंधश्रद्धेचेच लोक जास्त असतात…©️

श्री विठ्ठल - देही अन् विदेही - देही अन् विदेही बनवितो कोण? अज्ञानी मानवांना हे काही समजू शकणार नाही. सत तत्व जे आहे, ते फार दयाघन आहे. जडत्वाने नटलेल्या मानवांना ह्याचे पूर्वीचे गाठोडे पाहून सानिध्यात घेतले आहे. कोणत्याही मानवाची मनोभावना असते, भक्ती करतो, नामस्मरण करितो, ते मी करतो. यातूनही परमेश्वर मला भेटत नाही…

Read More

पोपटपंची चालणार नाही…©️

श्री संत एकनाथ महाराज - जनार्दन म्हणजे जनाला धन, विद्या देणारे, जनांच्या वेगळे असणारे तत्व ! अनंत रूपाने आहेत ते ! एकच तत्व गुरुस्वरूप नटले आहे ! पण प्रकृती भिन्न असल्याकारणाने पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. समदृष्टीने पाहिल्यास एकच तत्व, ॐ कार स्वरूप नटलेले आहे. प्रकृती भिन्न आहे, परंतु तत्व अभिन्न आहे. अभिन्न…

Read More

दृश्य आहे तेच अदृश्य आहे…©️

श्री संत एकनाथ महाराज - आम्ही, माझ्या समर्थांच्या कृपेने त्यांच्या चरणात लीन होतो म्हणूनच गती मिळते. तेच सर्वस्वाचे निधान आहेत. मी, माझे समर्थ जनार्दन स्वामी, त्यांना मी सर्वस्व वाहिले होते. त्याप्रमाणे आमची ठेवण होती. मग दुसरीकडे भटकण्याची आवश्यकता काय? ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून, ॐ कार बीज मात्रेण | नित्यम्…

Read More

सद्गुरु महिमा…©️

श्री एकनाथ महाराज - सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या चरणांचा कण आहे. मग सद्गुरु महिमेचा अंत त्याला सापडेल का? त्यांच्या लिलेचाच जर अंत सापडला नाही, तर त्यांचा अंत सापडणे दुरापास्त आहे. अनंत कोणी टोपी आहे ती ! मग त्यांच्या महिमेचा अंत…

Read More

कोणीही मरत नाही…©️

श्री संत ज्ञानेश्वर - कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही. नासते म्हणावे तर परत जन्माला कसे येते? हे करतो कोण? एकच सत् ! गुरुमाऊली !! ज्यांना कर्तव्य करून घ्यावयाचे असते, तेच उत्पत्ती स्थिती अन् लय करीत असतात. दुसरे कोणीही नाही. बहुत जन्मांचे सुकृत, त्यांची भरपाई झाल्यानंतर ते आपल्या सानिध्यात घेतात. असे ते मालिक…

Read More

अमर काय आहे ? ©️

श्री संत ज्ञानेश्वर - दिसे ते नासे | न दिसे ते अमर असे || जे दिसते, ते स्थूल दिसते. जड दिसते. अन् जे सत् आहे, ते या जडाच्या आंत आहे. ज्यांच्या आधीन हे जडत्व आहे, ते कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने हे जडत्व फेकून देण्याचा प्रयत्न करतात. त्याला कोणी जाळले, तर कोणी पुरले. तत्त्वात तत्व मिलन…

Read More

अखंड तत्त्वापासूनच ॐ कारांची निर्मिती ©️

श्री समर्थ मालिक - माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य वगैरे काही नाही. मला कोणीही पाहू शकणार नाही. पाहता येणार नाही. जो पहावयास आला, तो माझ्यातच रममाण झाला. लयबद्ध झाला. मला अनंत हस्त, अनंत चक्षू, अनंत पाद असा मी आहे. माझे वर्णन कोणालाही…

Read More

आकार कोण आहेत, हे ओळखा ©️

श्री समर्थ मालिक - माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे हेच सताचे बोल ओळखावेत. सर्वांना अन्न पाणी देणारे, पोसणारे हे एकच तत्व आहे. ते सर्वभूतेषु…

Read More

मानव फसला जातो…©️

श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते. इतकेच सांगावयाचे आहे, याची मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले. हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर वेगळे तत्व आहे असे…

Read More

You cannot copy content of this page