श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल.
या दरबारातील सेवेकरी अप्रकाशित नाहीत. अप्रकाशित म्हणावे तर ते बसल्यानंतर रममाण होतातच ! म्हणून अप्रकाशित म्हणता येणार नाहीत. पण जी गती पाहिजे, ती अजून मिळालेली नाही.
कांही सेवेकर्यांनी पाठीमागे विचारले होते की, आसनाला स्थूल अधिकार कां नसावेत? असे प्रणव निघालेले आहेत. हे आत्ताच कळणार नाही. वेळ आल्यानंतर आपोआप कळेल. दिसण्यात येईल. स्थूल अधिकार नाहीत म्हणावेत तर रंजल्या गांजलेल्यांची कार्ये किती झाली आहेत? स्थूल मानवावर कर्तव्य करून त्यांना मुक्त केलेले आहे की नाही?
रामावतारात स्थूलावर कर्तव्य होत होते. कृष्णावतारात अचेतनाला चेतनामय करून कर्तव्य करून घेतले. आता सूक्ष्माचे कर्तव्य करून घेत आहे. या सूक्ष्मावरून स्थूलावरचे कर्तव्य आपोआपच होणार आहे. हल्ली काय होत आहे, ते सर्वस्व कळत आहे. म्हणून जे होत आहे ते पहात रहा. तुकारामांच्या बोलावरून आपण शरण गेलात की नाही ! याचे विवेचन आपणच करा. ©️
