Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्‍याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

आपला राजमार्ग कोणता …©️

आपला राजमार्ग कोणता …©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – जरी स्थूलात वा स्थूलाने या आघोरांचा नाश केला तरी देखील सूक्ष्माने त्याच अघोरांनी मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात की आजही अशांचे मानव उपासक आहेत की नाहीत?अशा तऱ्हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एखाद्याने म्हटले की मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का?

आपल्याला काय पहायचे आहे, काय मिळवायचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता तर भक्ती! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे तर भक्तीने! आपल्याला काट्याकुट्यातून जायचे नाही, गिरीकंदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राज मार्गाने वाटचाल करावयाची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपल्या इप्सित ठिकाणी पोहोचणारच!

अघोरांची निर्मिती केली ही सतानेच आणि नाशही सतानेच केला, करणार आहे याबद्दल शंका नाही. एवढी २५ अवतार कार्य झाली पण ॐकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला. भक्तीचा नाश झाला नाही तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ति, अहंकारी भक्ती, दुष्ट बुद्धीने वागण्याची तऱ्हा, मत्सर, द्वेष, याचा नाश झाला.

आपल्याला माहीतच आहे कोपिष्ट विश्वामित्र कसा होता. गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिष्ठ संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत. कधीकधी आम्ही चिडतो परंतु ते चिडत नाहीत, आम्ही त्यांना सांगितले या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यांनीही ते मान्य केले. ते सांगतात, सता आम्ही त्या युगात पाळले परंतु आता मी ही पाळणार नाही. ते कसे तर दयाशील, क्षमाशील, शितल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजण लिन असतात. ©️

You cannot copy content of this page