श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. ते जाणणे कठीण, तुकाराम महाराज म्हणतात ना, “तेथे पाहिजे जातीचे। येऱ्या गबाळ्याचे काम नोहे ।।”
पण जो भक्त, जो सेवेकरी हे साधू शकेल, ज्याचे मन सद्गुरुंबद्दलच्या भावनेने ओथंबलेले असेल तोच हे जाणू शकेल. काही भक्त आपल्यावर प्रसंग आला की धावत येतात. इतर वेळी टंगळमंगळ करतात. अशी जर भक्ती असेल, भावना असेल तर हृदयस्त विराजमान असलेल्या सद्गुरूंनी तरी काय करावे?
प्रवचन करीत असताना थोडेबहुत टोकले हे पाहिजेच. परंतु सद्गुरु माऊली दयाघन आहे ते त्यातूनही भक्ताला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरु कसे आहेत तर अति विशाल, अति शांत, अति कोमल! भगवद गीतेत कृष्णांनी अर्जुनाला सांगितले, “नाचतो मी तेथे भावो। ना भावो विद्यते सता ।।…©️
