Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्‍याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

ब्रह्मर्षी पद काय आहे…©️

ब्रह्मर्षी पद काय आहे…©️

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नतमस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे की मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती. असे ते गुरुदेव पितामह! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ट यातायात करीत होता. त्याकरीता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगिनींचा छळ करायला निघाला, ब्रम्हर्षी पद हे भक्तीचे पद! अनंतांनी बहाल केलेले पद!”

“ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक आहे ते ब्रह्म”अन अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट अन गुरुदेवांची बरोबरी होऊ शकेल का? अघोरांनी कितीही सिद्धी मिळवली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र-मंत्र,ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ कितीही असो तरीदेखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहे. भक्तीच्या पुढे त्यांचे काही चालत नाही. चालणार नाही. भक्ती म्हणजे काय? एकच नामस्मरण अन सद्गुरू ध्यान! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करता या दोघांचे समीकरण झाले तीच भक्ती! ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली शक्ती कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. भक्तीयुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत. गेल्या ३0 वर्षात जी काही कर्तव्य या आसनाकडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महाबलाढ्य ज्योती असोत, आसनाचे आदेश घेऊन निघालेल्या ज्योती समोर त्यांचे काही चालत नसे. या अघोरांनी सर्व काही प्राप्त करून घेतले होते तरी देखील आसनाने कर्तव्यासाठी पाठविलेल्यांचा त्यांना थांग लागत नव्हता. मग आता तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ती की अघोर तपश्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ! एकाच नामाच्या जोरावर चालणारी ही भक्ती! अघोरांकडे मात्र अनेक तऱ्हा मंत्र-तंत्र, अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे तर सताचे. म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नि:पात करता आला. या सर्वस्वाचे मूळ कोणते तर भक्ती! भक्तीपुढे अघोर तपश्चर्या कूचकामी आहे. परंतु आजच्या कलियुगी मानवांना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही…©️

You cannot copy content of this page