श्री विठ्ठल - सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे अन् त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यप्रविण असतो.
सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा. विठ्ठल हे…
श्री समर्थ मालिक -
सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे? जड आहे. स्थूल देह म्हणजे त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही. मी सगुण आहे, निर्गुण पण आहे. पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही.
आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते,…
श्री समर्थ मालिक - परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे.
आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे. याची वाढ कोणी करावयाची?
मानवी तऱ्हेने त्रास…
श्री समर्थ मालिक -
ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर अखंड तत्व, तेथून धूनधूनकार, अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. तोच ओमकार ! आकार हा ओंकार स्वरूप झाला, मग प्रश्नच उरत नाही. मग तत्वा समान झाले. प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे.…
श्री समर्थ मालिक - यश हे अवश्य आहे. पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्ष युक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्ष युक्त भावना असते. पण जोपर्यंत…
श्री संत नामदेव महाराज -
जगात काय श्रेष्ठ आहे? देव, दानव की आणखी काही श्रेष्ठ आहे, हे भक्तगणांनी ओळखायला पाहिजे. भक्तीचे मूळ ज्यांना सापडले त्याने मात्र ते कदापीही सोडू नये. चमत्काराच्या आधीन जाऊ नये. भक्ती ही चमत्कार रहित आहे. भक्ती करणे हे मानवांचे आद्य कर्तव्य आहे. भक्तीचे मूळ ज्या ठिकाणापासून मिळाले, ते ठिकाण सोडू…
श्री संत नामदेव महाराज - दुसरी गोष्ट, रुधीराचे दुधात मंथन करून शुभ्र केले आहे. कोणाला दुधाची, तर कोणाला ताकाची चव असते. ताक हे सर्वस्व शुभ्र आहे. दुधाला विरजण घातले की दही होते. त्याला आंबट वास येतो. त्याचे घुसळण केले की ताक बनते अन् लोणी वर येते. ते पण शुभ्रच असते.
आता या तिन्ही वस्तूंचा…
श्री संत नामदेव महाराज - ज्याने या सर्वस्व ब्रह्मांडाची रचना केली, आकाश, पृथ्वी, सर्वस्व सृष्टीची रचना केली, ते तत्व आमच्या सारख्या अज्ञानी सेवेकऱ्यांना म्हणतात, “काहीतरी सांगा.” पण मी काय सांगावे?
आज या अज्ञानी, अडाणी सेवेकऱ्याची कशी काय आठवण झाली? आज महान भाग्य म्हणजे, दर्शन मिळावे ही इच्छा आहे.
अनंत लाघवी तत्व, न धरता…
श्री समर्थ मालिक - मन कुठूनही आले नाही, मन हे माझ्यापासून आहे असे म्हटलेले आहे. मन म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण केलेले आहे. मनाचे आणि तत्त्वाचे बोलणे चालणे ओळखा. म्हणून सेवेकऱ्याने अशा तऱ्हेने वाटचाल करणे. मनाने जरी कोलांट्या उड्या घेतल्या, तरी देह सद्गुरु चरणांजवळ घालणे.
गुरु शिष्याचे प्रेमयुक्त भाषण पाहून मलाही आनंद होत आहे. कारण…
श्री समर्थ मालिक - गीतेत म्हटले आहे, “मन्नाथो श्री जगन्नाथो | मद् गुरु श्री जगद्गुरु || सर्वात्मा सर्व भूतात्मा | तस्मै श्री गुरुवे नमः || मग माझा वेगळा, त्याचा वेगळा असे होईल का? प्रकृती वेगळी असल्याकारणाने विशेष काही वाटते, म्हणून आकार निरनिराळा आहे आणि आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो. मानवांना हे समजत नाही. पण बोल…
श्री समर्थ मालिक - भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही.
सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी?…
श्री समर्थ मालिक - गीतेत म्हटले आहे, “मन्नाथो श्री जगन्नाथो | मद् गुरु श्री जगद्गुरु || सर्वात्मा सर्व भूतात्मा | तस्मै श्री गुरुवे नमः || मग माझा वेगळा, त्याचा वेगळा असे होईल का? प्रकृती वेगळी असल्याकारणाने विशेष काही वाटते, म्हणून आकार निरनिराळा आहे आणि आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो. मानवांना हे समजत नाही. पण बोल…