श्री समर्थ मालिक –
ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान आहे, बुद्धी नाही.
बुध्दी कुठून मिळते? म्हणजेच ज्ञानापासून प्रकाश व प्रकाशाच्या अनुसंधानाने बुद्धी ! सर्व काही सतापासून मिळते.
इतकेच, सेवेकर्यांना ज्ञान बुद्धी दिली, तरी विचार ज्ञान चालवता येत नाही. दरबार मध्ये जे घडले त्याची गती घेतली आहे. सेवेकर्यांनी पाहणी केली काय? दरबार मध्ये मिळालेल्या गतीबद्दल पाहणी केली काय?
सत् कोण? सद्गुरु कोण? सत् कोणत्या रूपात असते? हे समजल्यानंतर त्यांना विचारणा करता काय? सताला तुम्ही विचारले काय? त्यांनी काय सांगितले? सेवेकर्यांना ज्ञान आहे पण त्यांना ओळखता येत नाही. गोरक्षाने सुद्धा कर्तव्य केले होते, पण पुढे मच्छिंद्राचे बाबतीत कसे घडले? सेवेकरी तत्त्वाला ठाम आहे. पण ओळख पटली नाही. मर्म काय आहे ते घेता येत नाही. ©️
