श्री क्षिराब्धी – संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडी ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांना आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही.
आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ येणार असे किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट नाही. सर्व बाजूंनी विचार करून कार्य करावे लागते. ते करताना सत् कुठे आहे, असत कुठे आहे, कोणत्या बाजूने कार्य करावयाचे त्याचा पूर्णत्व विचार करून कार्य करावे लागते. ते करायचे आहे.
कलियुगातील स्थूलांगी मानवाचेच शुद्धीकरण आहे असे नव्हे तर, सूक्ष्म, कारण, महाकारण, अणू, रेणू, परमाणू, यांचेही शुद्धीकरण चालू आहे. अन् आता स्थूल मानवाचे शुद्धीकरण आहे. त्यात चौथ्या टप्प्याचा शेष भागाचे शुद्धीकरण होणार आहे.
शुद्धीकरण एका क्षणातही करता येते, पण तसे करावयाचे नाही. कर्तव्य करत असताना आपले परके पहावयाचे नसते. आपले आहे त्याला विरोध कसा करू ही शंका आणावयाची नाही. ©️
