Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

संधीकाळ आणि शुद्धीकरण ©️

संधीकाळ आणि शुद्धीकरण ©️

श्री क्षिराब्धी – संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडी ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांना आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही.

आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ येणार असे किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट नाही. सर्व बाजूंनी विचार करून कार्य करावे लागते. ते करताना सत् कुठे आहे, असत कुठे आहे, कोणत्या बाजूने कार्य करावयाचे त्याचा पूर्णत्व विचार करून कार्य करावे लागते. ते करायचे आहे.

कलियुगातील स्थूलांगी मानवाचेच शुद्धीकरण आहे असे नव्हे तर, सूक्ष्म, कारण, महाकारण, अणू, रेणू, परमाणू, यांचेही शुद्धीकरण चालू आहे. अन् आता स्थूल मानवाचे शुद्धीकरण आहे. त्यात चौथ्या टप्प्याचा शेष भागाचे शुद्धीकरण होणार आहे.

शुद्धीकरण एका क्षणातही करता येते, पण तसे करावयाचे नाही. कर्तव्य करत असताना आपले परके पहावयाचे नसते. आपले आहे त्याला विरोध कसा करू ही शंका आणावयाची नाही. ©️

You cannot copy content of this page