Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

अंध:कार दूर सारा…©️

अंध:कार दूर सारा…©️

श्री समर्थ मालिक – सर्वस्व भारतभूमीवर अंध:काराची छाया पसरलेली आहे. सर्वस्व अंध:कार दाटला आहे. याचे कारण कारभार आहे. सेवेकरी जे स्वयं प्रकाशात नांदतात, त्यांनी चिंता करावयाची आवश्यकता काय? त्यांनी चिंता करावयाची नाही.

आज जवळजवळ किती वर्षे हे चालले आहे? आराखड्याची माहिती अजून दिली नाही आणि मिळणारही नाही. हे तुम्हाला माहित की मला माहित?

यज्ञ चेतवणार असले तरी त्यांची मुदत असेल की नाही? किंवा ज्याने यज्ञ चेतवला त्याला तरी माहीत असेल की नाही? मग पाहू या पुढे !

ज्याला सत् भक्तीचे ज्ञान कळत नाही, तो यज्ञच चेतवणार. ज्याला सद् भक्तीचे ज्ञान कळले आहे, तो ढुंकूनही यज्ञाकडे पाहणार नाही. स्वयम् अखंड यज्ञ हृदयात तेवत आहे, पण त्याला शांत करण्याचे सामर्थ्य यांचे जवळ नाही. मग बाहेरचा यज्ञ काय शांती करणार? स्वयम् यज्ञाला स्वाहाकार मिळाल्याशिवाय तो शांत होणार नाही. जो अग्नी, यज्ञ तेवत आहे तो भक्षाकरता भुकेलेला आहे. तो वाट पाहत आहे. मग तो कोणाचे भक्ष करणार? अन् कशासाठी?

मानवांच्या मनाची मनोभावना बदलली आहे. मुलगा पित्याला पिता म्हणावयास तयार नाही. इतका मानव पुढे गेलेला आहे. त्यासाठी जे घडणार आहे ते घडणार, यात संदेह नाही. ©️

You cannot copy content of this page