Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

तो जर सताला जखडून राहील…©️

तो जर सताला जखडून राहील…©️

श्री विठ्ठल – सद्गुरू साधे, सुलभ. कधीतरी लहरीत असल्यानंतर बोल फेकतात. ते मार्मिक बोल कसे आहेत हे सेवेकर्‍यांनी ओळखावे. सहज बोलणे असते. यात मर्म आहे. हाच उपदेश आहे. आज तो सेवेकर्‍यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु कृपेने स्वतःची खूण स्वतःच ओळखली नाही, तर तो मानव आहे हे सिद्ध होत नाही. मानवाने ज्याने हे ओळखले, त्यालाच ते सापडले, ज्याने ओळखले नाही, त्याला सत तरी कसा अंत देईल?

काही काहीजण मोठ मोठी प्रवचने सांगतात. त्याने जर ईश्वर पाहिला, तरच तो सांगतो की जगात परमेश्वर आहे. काही संतांनी कीर्तने केली, ती मानव सुधारण्यासाठीच केली. भक्तीचे वळण दाखविण्यासाठीच केली. आता पंढरीला पुष्कळ भक्त येतात व मंदिरात पुष्कळ गर्दी होते. कोणी बडव्यांच्या सोटक्यामुळे जवळ सुद्धा येत नाहीत. मग तो भक्त आहे असे म्हणावे का? बडव्यांना तरी कळले आहे का? पैशासाठी सारखी मारझोड चाललेली असते. जो भक्त आहे, त्याला काही सांगावे लागत नाही. तो जिथे बसेल, तेथेच तटस्थ राहील व विठ्ठल कोठे आहे हे पाहिल.

आम्हाला कोणीतरी अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणेच आम्ही चालतो.

ज्या ठिकाणी बसाल, त्या ठिकाणीच मला पाहू शकाल. मी कोणत्या रूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मी कोणत्या रूपात त्या ठिकाणी आहे? खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन आलो. नंतर मी बाल स्वरूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मानव हा चुकीला पात्र आहे. पण तो जर सताला जखडून राहील तर त्याच्याकडून चुका होणार नाहीत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page