Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे…©️

ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे…©️

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते.

दरबार मध्ये जी गती मिळाली, त्यामुळे अनेक सेवेकऱ्यांच्या भावना चलबिचल झाल्या असतील. पहिल्यांदा दोन ज्योती आल्या. नंतर तिसरी ज्योत आली. तदनंतर चौथी ज्योत आली. सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. त्याच्यासाठी सेवेकर्‍यांना ज्ञान, दिव्यदृष्टी व अनंत चक्षु पाहिजेत. त्याकरिताच त्यांना विचारले म्हणजे सद्गुरूंना विचारावे. म्हणजेच ज्ञान मिळत असते. इतर सेवेकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली की या ठिकाणी अघोर ज्योती आहेत व त्यांनी थैमान घातले. याच्याबद्दल सेवेकऱ्यांना ज्ञान असावयास पाहिजे होते.

ज्ञान सद्गुरु कृपेने मिळते. ज्ञानाचा उपयोग म्हणजे ज्ञानदीप आहे, म्हणजेच ज्ञान आहे असे सिद्ध होते. ज्ञान आहे, त्या ज्ञानाचे कर्तव्य म्हणजे उपयोग झाला पाहिजे. त्याप्रमाणे सेवेकर्‍यांनी वाटचाल करावी. ©️

You cannot copy content of this page