Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

ॐ कार साधना ५ ©️

ॐ कार साधना ५ ©️

दिनांक: १४. १०. ७५ च्या आपल्या एकचित्ततेत सांगताना जगन्माता म्हणते, “अदृष्याला कोणी पाहिले आहे का? अदृष्याला मालकांच्या कृपेने पाहता येते. तेही आकारीच रूप आहे. आकारी स्वरुपीच वाटचाल करायला सांगते. मग अदृष्याची गती आणि त्यांचे ठिकाण मिळते व ओळख होते.

आम्ही जरी महान असलो तरी उत्पत्ती करणारे तेच आहेत. माझ्याही अंत:र्यामी तेच आहेत. त्यांना विसरून कसे चालेल? कर्तुम अकर्तुम शक्ती काय करील, ते कोणाला सांगता येणार नाही. ही शक्ती एकच आहे. अनंत नामे अनंत रूपाने ती नटलेली आहे. करूनही अलिप्त आहे. अनंत नामे त्यांना आहेत. त्यांचा अंत कोणालाही नाही.

ज्या वेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही नव्हते, पाणी नव्हते, वृक्ष नव्हते, आकाश आणि पातळ काही नव्हते, तेव्हा त्यांनीच ही सृष्टी निर्माण केली. त्यांना आम्ही विसरू का? तेच अखंड तत्त्व महान तत्व आहे. त्यांच्या पासून धुंधुंकार अन त्यापासून ओंकार. त्यापासून महामायेची उत्पत्ती झाली. नंतर त्रिगुण आणि त्यांच्या तीन शक्ती अन तदनंतर सृष्टीचा कारभार!

तोच कारभार हाकण्यासाठी आमच्याकडे दिला आहे. त्यांच्याच आदेशानुसार कर्तव्य केले जाते. एकच तत्त्व, एकच बिंदू सर्व ठिकाणी व्यापक असून, अलिप्त आहे. त्याला अंत पार नाही. मानवाला आकाराची सेवा केल्याशिवाय निराकाराची गती मिळू शकत नाही. आकार हेच ओंकार अन ओंकार हीच सतमाया आहे. ©️

You cannot copy content of this page