Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

संत समागमे धरुनी आवडी…©️

संत समागमे धरुनी आवडी…©️

श्री समर्थ मालिक – संत समागमे धरुनी आवडी | करावी तातडी परमार्थाची ||

आत्ताच्या युगामध्ये संत मिळणे दुरापास्त आहे. ज्याला भक्तीचे मूळ पूर्णत्वाने सापडले तोच त्या ठिकाणी चिकटून राहिला. तो इकडे तिकडे भरकटत नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्या तत्त्वाशी तद्रूप राहिल्यानंतर तो शांतच आहे. त्याला सर्वस्व सापडले आहे. त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तोच संत आहे.

या ठिकाणी काही लोक आहे त्यातील थोड्या जणांनाच ही खूण सापडली आहे. निष्काम वृत्तीने सेवेकरी कर्तव्याला झटत आहेत. जखडून आहेत ते सेवेकरी मात्र पूर्ण शांत असतात. त्यांना कळून चुकलेले असते. जे माहित नाही ते माहित झाल्यानंतर त्यांना कशाचीही अपेक्षा नसते.

या ठिकाणी स्पष्ट निवेदन केले आहे. जे गुप्त आहे, ते दाखविले आहे. पूर्वीच्या कर्म संचिताप्रमाणे काही सेवेकरी अडीअडचणीत असतात. म्हणून अवधी असतो. तरी त्याने मन मोकळेपणाने कर्तव्याची वाटचाल करावी. शंका रहित कल्पना रहित होऊनच वाटचाल करावी. जे केल्याने सद्गुरुंची प्राप्ती होते, सद्गुरु चरणांची प्राप्ती होते. ©️

You cannot copy content of this page