Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

मी कुठे आहे?…©️

मी कुठे आहे?…©️

श्री समर्थ मालिक – भक्त भगवंताचे ठाई अन् भगवंत भक्ताचे ठाई असतात. मी कुठे आहे? हे या यत्किंचित मानवांना काय कळणार? मी नाही आकाशी, मी नाही पाताळी. कोण माझा शोध घेणार आहे? जो भक्त आहे, तोच माझा तपास करू शकतो. अघोर कधीही माझा शोध घेऊ शकणार नाहीत.

बरेच दिवस आसनाधिस्तांचा अन् माझा वाद चालला आहे. मी चाल ढकल करीत होतो, पण आता मात्र डोक्यावर ओझे आहे. थोडे संयमन आहे. हे ओझे माझ्यावर जास्त झाले, तर ही धरा सुद्धा स्थिर राहणार नाही. हलणार आहे. मात्र शांत रहा. शांती हिच कामाला येते. ज्या सेवेकरीणीला त्रास दिला, तिच्या चरणांवर लोळायला लावीन. नाहीतर मी सत नव्हेच ! त्या सेवेकरीणीसाठी आसन, आसनाधिस्त जितके तळमळत आहेत, तितकाच मी देखील तळमळत आहे. अघोर मानवांना तोंड देऊन आसनाच्या कर्तव्यासाठी जागत आहे. ठीक आहे, माझ्याशी गाठ आहे.

स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ताळात माझे लक्ष असते. भक्ताच्या ठिकाणी लक्ष असते. मी निराकारी असतो तर कोणी पाहिले नसते. आकारातच माझा वास आहे हे सेवेकऱ्यांनो लक्षात ठेवा. नाही पेक्षा तुमच्यासारखे अभागी तुम्हीच ! पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे सानिध्यात घेतले आहे. आसनाधिस्त म्हणतात, मला या ठिकाणी का फेकले? कारण अघोर मानवांचे शुद्धीकरण करावयाचे होते. काही ज्योतींना सानिध्य द्यावयाचे होते म्हणून त्या ठिकाणी आसन टाकले आहे. थोड्या दिवसात आपणास सर्वस्व समजेल. (समाप्त)©️

You cannot copy content of this page