Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

भांडते ते अज्ञान भांडते…©️

भांडते ते अज्ञान भांडते…©️

श्री स्वयंभू महेश – भगवंताने आकार मानव रूपातच घेतला आहे. काही कुर्म, वराह सुद्धा अवतार झाले आहेत, पण मानवात अवतार घेऊन त्याने जागे केले तरी तो मानव निद्रिस्तच आहे. हे फक्त प्रकृतीचे चाळे आहेत. प्रकृती अंगाने सेवेकर्‍यांनी जाऊ नये. ही माझी इच्छा आहे. प्रकृती भिन्न आहे म्हणून सांगत आहे.

भिन्न भिन्न प्रकृती | कर्मभेदे दिसती || प्रकृती भिन्न आहे. मानवाने विचाराने त्यांना नावे ठेवली आहेत. विचार आणि प्रकृतीला शुद्ध, अशुद्ध बनवले आहे. जर शुद्ध विचार असता तर हा वाद निर्माण झाला नसता. रंग भिन्न असेल पण तो प्रकृतीचा आहे. शिवू नको, विटाळ होईल. हे कोण म्हणते? तर प्रकृती !

मनाने अशुद्ध विचार करतो असा जो मानव आहे त्याला भगवंत सापडला आहे का? जाणणारा असेल तर त्याला हे सर्व एकच आहे. मानवाचे मन फिरते, त्याप्रमाणे मानव फिरतो. मानव त्रिगुणांची उपासना करतात. कोणी विष्णूची, कोणी शंकराची ! म्हणून प्रकृतीचा वाद लागतो. मी सर्वस्व पहात असतो.

भांडते ते अज्ञान भांडते. अज्ञानामुळेच जन्म कर्म होते ! ज्याला स्वयम ज्ञान आहे तो केव्हाही फसणार नाही. आज स्वयमेव शिवाची रात्र आहे. एकच, ॐ कार तत्त्व सर्वभूतेषु पश्य आहे. ते तत्व आहे. आकारात आहे म्हणून पाहता येते. आकारात नसेल तर कोणाचीही पाण्याची हिंमत नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page