Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

मानव कशाला फसतो…©️

मानव कशाला फसतो…©️

श्री स्वयंभू महेश – हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही.

गुरुपद म्हणजे आकार आला. मानवाला त्याची सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला सद्गुरू चरण कसे सापडणार? ज्याला काही कळत नाही, तो उघड्या धोंड्याला शेंदूर थापून त्याला आकारात आणतो, त्याच्या पाया पडतो पण त्याला बोलता येत नाही. अशा गोल आकारी दगडाच्या पाया पडणारा मानव त्याला बोलत्या चालत्याचे दर्शन घ्यावयास लाज वाटते. असेच मानव आज आपण पहात आहोत. काय चालले आहे हे कळते आहे, पण मानव फसतो आहे.

मानवानेच आकार आणि मूर्ती बनवली. तिची स्थापना केली, पण त्याची व्यवस्था नसेल तर कुत्रा त्या ठिकाणी नीच कृत्य करतो त्याच्याच मानव पाया पडतो. अशावेळेस ईश्वर तत्व कुठे आहे हे त्याला कळत नाही. कुत्र्याने जरी नीच कर्म केले तरी त्यात देखील सत् आहे, पण पाहणाऱ्यालाच दिसेल, पण दगड अन् कुत्रा सारखाच का? पण जो पाहिल त्यालाच ते कळेल आणि तसे जो पाहिल तोच मानव श्रेष्ठ आहे. ©️

You cannot copy content of this page