पंढरपूर निवासी श्री विठ्ठल – ब्रह्म - ब्रह्म म्हटले म्हणजे त्या ठिकाणी सर्वस्व स्थिरावले जाते. हे उच्च कोटीचे स्थान होय. ज्याला स्थिती स्थापकत्व, त्या ठिकाणी सर्व लय होते, मिलन होते. सद्गुरु मिलन तेच ब्रह्म होय. मानवाचे कोड कौतुक पुरविण्यासाठी त्रिगुणात्मक आकार निर्माण होतो. त्यावेळेला अल्प बुद्धीप्रमाणे जवळ असते ते सांगणे होते. चित् सत् त्याचा आनंद…
सद्गुरु हेच माझे दैवत, पिता, माता सर्वस्व आहेत. असे जो सेवेकरी जाणतो, त्या सेवेकऱ्यास सर्वांगीण सेवा काय आहे ते कळते. पण काही नुसते सद्गुरूंशी गोड बोलणारे आहेत. अशांची कितीतरी सेवा राहिली आहे, चुकली आहे, पण त्यांनी कधी कोणाला काही म्हटले आहे का, की आपण सेवा का देत नाही? त्यांना माहीत असते, हा सेवेकरी अखेरीस कुठे…
सद्गुरु आणि आपण वेगळे आहोत असे काही आहे का? सद्गुरु समान बनले पाहिजे. ते अंत:र्यामीच आहेत म्हणून आपण बोलता, चालता, नोकरी करता, पण अंत:र्यामीचे तत्व बाहेर पडल्यानंतर, मनाच्या मनमौजा चालतील का? मग आणखी सद्गुरु आणि मी वेगळा आहे असे म्हणता येईल का? सद्गुरु चुणूक देऊन, प्रकृती कडून बोल फेकतात.
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी…
जी अखंड सेवा आसनावरून दिली, तो अखंड ध्वनी आसनी-शयनी, भोजनी, तसेच सर्व कर्तव्यात सारखा चालू राहील, मग त्या सेवेकऱ्याचे भलेबुरे पहाणारे कोण? तर तेच ! मी नव्हे ! ज्याला तुम्ही शरण आहात ते !
आरती म्हणजे काय? हे सेवेकर्याला कळले आहे का? आरती, अनंत भूजा ! विठो पंढरी राजा !! आरती या तीन अक्षरांचा…
जी अखंड सेवा आसनावरून दिली, तो अखंड ध्वनी आसनी-शयनी, भोजनी, तसेच सर्व कर्तव्यात सारखा चालू राहील, मग त्या सेवेकऱ्याचे भलेबुरे पहाणारे कोण? तर तेच ! मी नव्हे ! ज्याला तुम्ही शरण आहात ते !
आरती म्हणजे काय? हे सेवेकर्याला कळले आहे का? आरती, अनंत भूजा ! विठो पंढरी राजा !! आरती या तीन अक्षरांचा…
श्री समर्थ मालिक - सर्वांगीण सद्गुरु सेवा – सर्वांगीण सद्गुरु सेवा करणारा सेवेकरी आहे का? सर्वांगीण सद्गुरु सेवा करतो म्हणजे तो सेवेकरी कसा असतो? तो निष्कांचन असून, त्याचे ठिकाणी पूर्णत्व वैराग्य वृत्ती असते. हे सर्वस्व माऊलींचे असून माझे काहीही नाही अशी पूर्णत्वाने त्याची वृत्ती असते. ज्या वेळेला शरण, त्याच वेळेला त्याने आपले तन-मन-धन सर्वस्व सद्गुरू…
आसनाला स्वयमेव अधिकार आहेत. वेळ येईल त्याप्रमाणे वापरण्यात येतील. स्थूल अधिकार हे स्वयमेव अधिकार आहेत. प्रश्न एवढाच, केव्हा आणि कुठे वापरावयाचे? तो अमोलिक ठेवा दिलेला आहे.
हे आसन उत्तरेला होते. त्यावेळेला महाभारत घडले. या वेळेला हे आसन महाराष्ट्रात आहे. त्याच्या मुक्ततेचा काळ फार जवळ आलेला आहे. असे संघर्षण होऊन, महान चमत्कार घडणार आहेत. महाराष्ट्राचे…
मानवी सेवेकरी गृहस्थाश्रमी आहेत. मायावीत गुरफटलेले आहेत. माया ही सत पण आहे आणि असत पण आहे. सत मायेने गेल्यानंतर सत पदाला जातो. सत मायने वाटचाल केल्यानंतर अंतर्यामीने प्रेरणा दिली की तो पाहतो. हे साधल्यावर तन मन धन ही तिन्ही अंगे अर्पण करावी लागतात. तुमच्या भक्ती प्रमाणे जे रुजू करावयाचे, तोच हा महान दिवस आहे. ज्यांना…
श्री गुरुपौर्णिमा – आज या शुभदिनी केलेली वेडीवाकडी पूजा चरणांवर रुजू आहे. कारण सेवेकरी अडाणी, अडबंग असतो, पण त्याने स्वयंस्फूर्तीने केलेली पूजा चरणांवर रुजू करून घ्यावी लागते.
पूजा कशी करावी ? कोणत्या तऱ्हेने करावी? याचा सेवेकऱ्यांना गंध नाही, पण अल्प बुद्धीने, स्वयंपूर्तीने केलेली पूजा सेवा रूजू आहे. जसजसे संदेश मिळतील त्या त्याप्रमाणे सेवेकऱ्याने पूजा करणे.…
श्री समर्थ मालिक - सेवा आणि सेवेकरी याचे स्पष्टीकरण झालेले आहे, तरी सेवा आणि सेवेकरी याचा अर्थ पूर्णत्वाने अजून समजलेला नाही. सेवेकऱ्याने सेवा कोणाची करायची आणि काय सेवा करणार याचा प्रत्येक सेवेकर्याने आपल्या मनात अर्थ लावणे, याचे स्पष्टीकरण करणे. या सर्वस्वाचे स्पष्टीकरण आपणास पुढे मिळेल.
अखंड आसनाचे सेवेकरी महान पदाचे आहेत. त्याप्रमाणे त्याने सेवा कोणाची,…
संत जनाबाई –विठ्ठल पांडुरंग ! सर्व घरी व्यापक असूनही अलिप्त आहे, तेच ते सत ! तेच ते सत आसनावर आरुढ आहे. मला भोळ्या भाबड्या सेवेकरीणीला, दासीला चकविण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्यक्ष सद्गुरु दरबारात बोलावणे झाले, आनंद वाटला. आज कशी काय सताला आठवण झाली याचे आश्चर्य वाटले. आपण मला महान भक्त म्हणता, पण जे महान…
स्थूल जडत्वाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. जडत्वाला व्याप झाले तर मानव कासावीस होतो आणि अशाच वेळेला त्याला परमेश्वराची आठवण होते. जडत्वाच्या पाठीमागे व्याप लागल्यानंतरच मानव देवाचे नाव घेतो. देवाचे ध्यान करतो. अखेर ईश्वरा जवळ शांती मिळविण्यासाठी ओरडतो. पण खरोखर जडत्व जे आहे ते वर्षाचे १२ महिने सुखी असेल का? आणि शांततेत…