रुक्मिणी माता – (आषाढी एकादशी) प्रथमच परब्रम्ह तत्त्वाने, आपण ज्यांना परब्रह्म म्हणता (याच ठिकाणी माझी मान लवते, त्यांनी सुद्धा मान लवविली) मग परब्रह्म कोण? म्हणून माझी कर्तव्य मी करीत आहे. पण एवढेच आहे, जे सर्व भूतेषु पश्य ते सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा अलिप्त आहेत. याची गती मिळण्यासाठी कोणाची तरी साथ हवी असते. साथ मिळाल्यानंतर…
गुरुपद हे अखंड त्रिकाला बाधित आहे. ते कोणीही निर्माण केलेले नाही. कोणीही निर्माण करविता नाही. असे हे स्वयं आणि अखंड पद आहे. याची महती, महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांची वाणी, त्यांचे आदेश याला अतिशय महत्त्व आहे.
गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे. हे अनाठाई जाणार नाही. स्वयंपद गुरुपदाच्या मुखातून निघाले, तरी पण ते…
सत् भक्तीचा प्रकाश - आपल्या भारत भूमीमध्ये प्रत्यक्षात भगवंताने अनेक अवतार नटवून त्याला पुनीत केलेले आहे. असा हा महान पवित्र व मंगलमय देश आहे. याच भारत भूमीमध्ये अनेक ऋषी, मुनी, महामुनी व तत्वज्ञानी जन्माला आले. सर्व विद्येमध्ये पारंगत असे ज्ञानी, साधू, संत, आचार्य, महंत याच भारत भूमीमध्ये निर्माण झाले.
एकेकाळी या देशामध्ये शूर, वीर,…
“मन हे मज पासोनी जाण |” मग मन आळवले असा योगी कोण? हे जरी मजपासूनही असले तरी प्रत्येकाची प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे का? आणि म्हणूनच मनाची ठेवण, त्या तऱ्हेने चाचपणी असते. प्रकृती शुद्ध नाही मग मन गढूळ होणारच ! प्रकृतीच्या तरंगामुळे मन चल बिचल होते. भूमी शुद्ध झाल्यानंतर कृतीमान असले पाहिजे, अन् हे जर टिकविले,…
श्री विठ्ठल - एकादशी या महान महत्वाच्या दिवसाचा अर्थ काय? प्रथम सेवेकर्यांने सत बनण्याचा प्रयत्न करणे. पूर्व संचिताप्रमाणे मानवाने, सेवेकऱ्याने सत् बनण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु तत्त्व कोण आहे? ज्या आकाराला आपण शरण आहात, ते जे तत्व बहाल करतात, चुकलेली जागा दाखवतात, त्यांच्या ठिकाणी रममाण होणे, दहा इंद्रियांचा संयम करून एकाग्र करणे व अकराव्यात लय करणे.…
श्री विठ्ठल - दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे ते…
ही प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी त्या पात्रतेला अजून गेलेले नाहीत. पण मला लाघव करण्यासाठी चांगला वाव मिळतो, म्हणून ते कर्तव्य मी माये कडून करून घेतो.
मी करूनही अकर्ता ! सुखदुःखाच्या वेगळा आहे. वेगळा असून सुद्धा पाप पुण्याच्या निराळा आहे. सर्व…
श्री समर्थ मालिक - आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो. म्हणजे आकार दृष्य झाला असे वाटते, कोणाला अन् नाही कोणाला? स्थानवंत आहे, त्या अर्थी आकारी आहे. आकारी असून निराकारी आहे त्याचा ठावठिकाणा नाही.
मी कोणीही नाही, मी निमित्त मात्र आहे. असे जरी म्हटले तरी एक तत्त्व…
बोलांची टोचणी करून अजूनही सेवेकरी सागरातल्या जलाप्रमाणे होत नाहीत. हो ! पण सागरातील जल खारट असते. प्रत्येक सेवेकरी खारट झाला, तर कसे जमणार? पण त्या सागरासारखे तरी सेवेकरी आहेत का?
भक्ती ही साधी, सोपी अन् सुलभ आहे. पण त्या भक्तीची लाज राखणे दुरापास्त आहे. भक्तीला तेज आणणे सेवेकऱ्यांच्या हातून होत नाही, म्हणून सेवेकरी फसतो.…
श्री समर्थ मालिक – प्रवचन म्हणजे काय? परांचे वचन, त्यांचे बोल ! ते ऐकण्याची इच्छा म्हणा. सेवेकऱ्यांची महान इच्छा असते प्रवचन ऐकण्याची, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालले आहेत का? आदेश मानले आहेत का? मनात रुजू करून घेतले आहेत का?
सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही, मग तुम्हाला सांगून ते करून…
दिनांक: २० जुलै १९७२ सेवेकरी विष्णू कदम - अचानक झालेल्या घटनेमुळे फारच वाईट वाटते. स्थूलात राहण्याची इच्छा होती, पण समर्थ इच्छेने जे काय होईल ते फार चांगले असते. सेवेकर्यांनी इच्छा दर्शविली की तो मायावी गतीने जातो. समर्थ इच्छेने जे होते ते हितकारक असते. म्हणून मी इच्छा काय आहे ते सांगत नाही. सानिध्यात असताना ही गती…
श्री समर्थ मालिक – || तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न ||
मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात. मग सेवेकरी अभिन्न का होत नाही? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये?
ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला नाही. त्यांने सताचे…