आदेशाप्रमाणे जन्माला घातला. जन्माला घातल्यानंतर पुढे ज्ञान बिजाचा अंश फेकला जातो. ज्ञान बिजाचा अंकुर फुटल्यानंतर, अशाप्रकारे सतामध्ये रममाण झाल्यानंतर तो सर्वस्व सारख्या दृष्टीने पाहतो. किती जरी मानवांनी त्रास दिला, तरी तो आपले कर्तव्य सोडून दुसऱ्या चाकोरीने जाईल काय? त्याला पूर्ण माहीत होते, हे कोण करते आहे. म्हणून संतांनी सत् चाकोरी कधीही सोडली नाही. हे सत्य…
श्री समर्थ मालिक - कर्मयोगातल्या शाखा दोन आहेत – एक सत् आणि एक असत !
संतांनी लिखाण करून ठेविले आहे – सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वां मुखी मंगल बोलवावे ! सध्याच्या युगात कोणी सेवेकरी असा झाला आहे का? भारतातील सर्व मानव, सत्कर्म योगाने मुक्त असते तर, भारताची ही स्थिती झाली नसती. म्हणून जन्माला घातल्यानंतर…
सेवेकऱ्याने अंत:र्दृष्टीने पाहिल्यानंतर जी पाच तत्वे आहेत, ती निराकारी आहेत हे कळू लागते, मग ही पाच तत्वे आहेत, ती आकारी कशी केली? आणि कशासाठी केली? या पाच तत्वांचा एक आकार जमवून, त्या आकाराच्या आत निराकार बसले आहेत आणि आतल्या आत चुपचाप पाहत असतात. आकारी पिंजरा निराकारी केव्हा होतो? तेच सद्गुरु अविनाशी तत्व बाहेर पडल्यानंतर, आकारी…
– आपण सर्वस्व चरणांवर वाहिल्यानंतर हे कार्य कसे होईल हे विचार यावेत तरी कशाला? आपण सद्गुरु चरणात लिन झालो आहोत, रममाण झालो आहोत, मग बाकीच्या इतर गोष्टी मालिक करून घेणार नाहीत का? सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्णत्वाने लिन झाल्यावर, सद्गुरु आपोआप मार्ग दाखवतात. म्हणजे सर्वस्व कार्य सिद्ध होत आहे.
सद्गुरु म्हणजे पोरसातील वांगी नाहीत. अज्ञान अंध:कारातून…
लिनता, नम्रता आणि शांती या त्रिवेणी संगमात सेवेकरी आंघोळ करील तर तो सेवेकरी चुकणार नाही. या त्रिवेणी संगमातील आंघोळीचा अभाव म्हणून सेवेकरी चुकतो.
सेवेकऱ्यांना माहीत असताना, आदेश दिले असताना, जर चूक केली, तर जाणून बुजून चुक केली असे होईल. समर्थांच्या कर्तव्याकडे मात्र सेवेकऱ्यांना लक्ष ठेवता येते, पण आदेशाप्रमाणे, संदेशाप्रमाणे कर्तव्य करता येत नाही. कर्तव्य…
भक्तीला असे काही एक लागत नाही. लागते, पण एकच ! मनाची शुद्धता !! ती शुद्धता असल्यानंतर मन गढूळ करण्याची काय आवश्यकता? मनाच्या चाकोरीने अंगावरचे वस्त्र रंग देऊन भगवे करावयाचे असते, पण मुळात ते शुभ्रच असते. मग त्याला रंग चढविण्याची काय आवश्यकता? रंग तो कशाला? तर मानवाने त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी हे केलेले असते. भक्तीला सोंगं ढोंगं…
श्री समर्थ मालिक - अखंड सेवा हि दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे. अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड नाही,…
श्री समर्थ मालिक - स्थूल जडत्वाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. जडत्वाला व्याप झाले तर मानव कासावीस होतो आणि अशाच वेळेला त्याला परमेश्वराची आठवण होते. जडत्वाच्या पाठीमागे व्याप लागल्यानंतरच मानव देवाचे नाव घेतो. देवाचे ध्यान करतो. अखेर ईश्वरा जवळ शांती मिळविण्यासाठी ओरडतो. पण खरोखर जडत्व जे आहे ते वर्षाचे १२ महिने सुखी…
अघोर मनाच्या आधीन बनल्यानंतर, तो मनाच्या आधीन होतो, मग त्याच्याकडून त्याच्याच मनाप्रमाणे कर्तव्य करून घेतो. असे करताना तोच खड्ड्यात पडतो. त्यातून वर निघण्यास त्याला पुष्कळ यातायाती पडतात.
आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती असत मातले आहे? सत् भक्तीचे वळण नाही. मात्र काही मानव चमत्काराला भाळणाऱे आहेत, त्यातच त्यांचे मन निमग्न झाले आहे. क्वचितच सताच्या मागे…
पण इतकेच आहे की, अघोराचा कोणत्या तऱ्हेने नाश करणे हे मी जाणतो. हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते सोडणार नाही. हे कर्तव्य मी करून घेतो. मी कोठेही जात नाही. मी अंत दिलेला नाही आणि कोणी लावलेला नाही, लावू शकले नाहीत. मी एकाच ठिकाणी आहे असे मला कोणी पकडू शकेल का? सेवेकऱ्यांनी माझा थांगपत्ता लावलेला…
श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, त्याठिकाणी त्याची छाया आहे. मनुष्य नसेल, तर त्याची छाया नाही. तसेच हे त्रिगुण आहेत. त्यांची पण छाया असणारच ! प्रत्येक तत्वाला अधिकार दिलेत. त्याची हेळसांड झाल्यामुळे, त्यांना सुद्धा शासन देण्याचे सामर्थ्य कोणाजवळ तरी…
काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण कोणत्याही स्थितीत शोधा-शोध केली, तर आपणास कळेल की, हे अखंड नाम कोणत्याही ठिकाणी दिले जात नाही.
येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषय निघाला की त्याच्यावर प्रवचन सुरू होते.…