Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

सेवेकर्‍याने कसे वागावे?©️

श्रीसमर्थ मालिक - प्रत्येक सेवेकऱ्याची योग्यता महान पदाची आहे. सेवेकऱ्याने वाटचाल करीत असताना सद्गुरु मूर्ती डोळ्यासमोर ठेवून अखंड ठेवा जो बहाल केलेला आहे, त्याचे मुखाने नामस्मरण करीत वाटचाल केली, तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच ! सत् मिळणे फार दुरापास्त आहे. रिद्धी सिद्धीच्या कोनातून वाटचाल कराल, तर आपली गती त्या चांगदेवासारखी होईल. आपल्या प्रभावाने चांगदेवाने सुद्धा…

Read More

सताचा शोध ©️

मालिक – सत् शोधण्यात जरी कालावधी लोटला, तरी हे सत् आहे की नाही, हे अजमावण्यात येते, म्हणूनच अवधी जात असतो. मानव भक्ती करताहेत. कोणती कां होईना? इथपर्यंत आले नाहीत, तरी त्या तत्वापर्यंत जातील. यामुळे लक्ष देण्यात आले नाही. फक्त त्याचा आढावा केव्हा घेण्यात येतो, ज्यावेळेला प्रत्यक्ष आसन या भागात पडले, त्यामुळे कार्यात लक्ष घालावे…

Read More

सतच आपणास सोडविते ©️

शकुंतला - स्थूलातील प्रत्येक ज्योतीला सुख दुःख संसार असतो. परंतु संसारात प्रत्येकाला सुख पाहिजे असते. सध्याच्या मानवाला संसारात सुखच आहे. त्या अरण्यातील भयंकर श्वापदे, वाघ, सिंह यांची आठवण झाल्यानंतर विचित्र स्थिती निर्माण होते. त्यावेळेला इतके अतोनात कष्ट काढले, दुःख भोगले, तरी प्रत्यक्ष पित्याला दया आली नाही. ज्या ठिकाणी असत, त्या ठिकाणी आदर तरी कां द्यावा?…

Read More

सतमय व्हा ! मालिकमय व्हा !! ©️

सौ. माधवी - महामूनि कण्व यांची पत्नी - विश्वामित्र आश्रमात आले, त्यावेळेला त्यांच्या कमरेला सर्पाने विळखा घातला होता. आता पण अशी स्थिती आहे. पण हा साप निराळा आहे. त्यावेळी त्या मातीच्या सर्पाला मालकानी संजीवनी देऊन त्याच्याकडून कार्य करून घेतले. तेच सत् आहे. आश्रमात २००…

Read More

जगात ईश्वर आहे – २ ©️

सौ. माधवी - जगात ईश्वर नाही म्हणून चालणार नाही. सर्वांनी एकच निश्चय करणे. जरी मी सेवेकरी आहे तरी संसारात आहे. त्याच्यात जो वेळ मिळेल, तो सत्कार्यात घालवीन. असताची बाधा होऊ देणार नाही. आपल्या स्थूलांगी सेवेकऱ्यात काहींचे एक तर काहींचे निराळे असते असे मालिक सांगतात, आसनाधीस्त सांगतात, पण घरातील कृती कोण पाहते? त्रिभुवनात एकही ठिकाण…

Read More

संसार करणारा मी कोण? ©️

ऋषीपत्नी सौ माधवी – कण्व मुनींची अर्धांगी. आपल्या स्थूलांगी सेवेकऱ्यांच्या संसारात काही वेळेला वाद उत्पन्न होतो. अनेक वेळेला आसनाधिस्तांनी सांगितले आहे, संसार करुनच परमार्थ साधावा. त्याशिवाय परमार्थाची जाणीव मिळणार नाही. तुमचा संसार लहान आहे. मोठा नाही. सध्याच्या सेवेकऱ्यांना चार पाचच मुले असतील. त्यावेळी आश्रमात किती मुले येत होती? ती सर्व आश्रमातच राहत होती. त्यांना…

Read More

अवतार कार्य ©️

श्री गुरुदेव पितामह - पूर्वी होऊन गेलेल्या युगाची मानवांना गणती आहे कां?सत् आणि असत ! पूर्वींचे सतयुग, आता कलियुग दाखवित आहे. नव्हे, दोन्ही युगे चालू आहेत. जो पूर्णांगी सत वागतो तो सतयुगातला आणि जो असत वागतो, तो असत युगातला होय, म्हणजे कलियुगातला होय. आदीअंतापासून अवतार कार्ये चालू आहेत याची गणना मानवाने केली आहे कां?…

Read More

आत्मज्योत प्रगटणे – ©️

*आरती सद्गुरुंची उजळली अंतरी |* *प्रकाश थोर झाला, साठवेना अंबरी ||* लक्षात घ्या नाम केंव्हाही घेऊ शकता, परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सद्गुरू चरणांवर अर्पण करुनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीत आपण नामाची…

Read More

जड आहे तर भक्ती आहे ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकरी म्हणतात कि, मालिक तुम्हीच करून घेणार आहात. पण हे तत्व कसे आहे कि, यात कोणीही मिलन होऊ शकणार नाही. सतमय जे आहे तेच सत् ! तेच ब्रह्म ! तेच समर्थ ! आपल्यातच आहेत. तेच आपणाला उपदेश सांगतात. म्हणून दिलेला अखंड नामाचा उजाळा करणे, पण ते कोणी करीत नाही. स्थुलाला…

Read More

कर्मयोग-३ ©️

आदेशाप्रमाणे मानवाला जन्माला घातला. जन्माला घातल्यानंतर पुढे ज्ञानबीजाचा अंश फेकला जातो. ज्ञानबीजाचा अंकुर फुटल्यानंतर, अशाप्रकारे सतामध्ये रममाण झाल्यानंतर तो सर्वस्व सारख्या दृष्टीने पाहतो. किती जरी मानवांनी त्रास दिला, तरी तो आपले कर्तव्य सोडून दुसऱ्या चाकोरीने जाईल काय? त्याला पूर्ण माहीत होते, हे कोण करते आहे. म्हणून संतांनी सत् चाकोरी कधीही सोडली नाही. हे सत्य आहे…

Read More

कर्मयोग-२-©️

ज्या भक्ताला चमत्कार पाहिजेत, नाव पाहिजे, लोकांनी मानले पाहिजे, मी कोणीतरी आहे अशी ज्यांची भावना असते, महान साधू आहेत, त्याने जर चमत्कार दाखविले, तर हा कोणीतरी महान योगी आहे असे मानव म्हणतात. पण मानवांना अद्याप कळलेले नाही, जो वाटेल त्या परिस्थितीत आपली सत् चाकोरी ढळू देत नाही, त्यालाच महान सत्पुरुष म्हटलेले आहे. त्याला सत…

Read More

कर्मयोग ©️

कर्मयोग - कर्मयोगातल्या शाखा दोन आहेत – एक सत् आणि एक असत ! विचारणा होते आहे, आनंदाची गोष्ट आहे. संतांनी लिखाण करून ठेविले आहे – सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वां मुखी मंगल बोलवावे ! सध्याच्या युगात कोणी सेवेकरी असा झाला आहे का? भारतातील सर्व मानव सत्कर्म योगाने युक्त असते तर, भारताची ही स्थिती झाली…

Read More

You cannot copy content of this page