Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

अहंकाराने वागतो, तो सेवेकरी नाही ©️

माझी भक्ती करा असे म्हणण्याची काहीही जरुरी नाही. पण जगी कायम टिकणारे कोण आहे? उत्पत्ती स्थिती लय स्थिती कशी होते? हे कोण करते? याची मानवाला जाणीव असावी लागते. म्हणूनच सृष्टीची रचना करावी लागली. हा आज कालचा काळ नाही. कोणी सांगेल का पृथ्वी कधी निर्माण झाली? कोणी निर्माण केली? असे सांगण्याचे कोणाचेही सामर्थ्य नाही, म्हणून…

Read More

नाम हे अनंत रूपाने नटले आहे ©️

श्री समर्थ मालिक - हल्लीचा मानव कोठे भटकतो, त्याची मोजदाद नाही. जो अमृताहुनी गोड पदाला मिळाला, ज्याने रस चाखला, तो यात रममाण झाल्याशिवाय केव्हाही राहणार नाही. ज्याला रममाण करावयाचे त्यालाच रममाण केले जाते. ज्याला याची गोडी नाही, त्याला कदापिही घेणार नाही. गोडी लागू देणार नाही. जे सानिध्यात आहेत, ज्यांना एक तत्व पटले त्यांनी कोणीही हे…

Read More

भक्ताचे भगवंता मध्ये सामावणे ©️

सद्गुरूंच्या आदेशानुसार जी ज्योत वागेल, त्याचे कोटकल्याण होईल. पण श्रद्धा बलवत्तर असल्याशिवाय एक तत्त्व नाम आपली कधीही गती देणार नाही. म्हणून एकाच तत्वाने, एकच नामाने अनेकांचा उद्धार झालेला आहे. अनेक संतांनी त्याचा उहापोह, त्याचे लिखाण केले आहे, म्हणून ज्याला ज्याची खूण माहिती झाली तरच तो त्यात रममाण होईल. ज्याने हे सर्वस्वाचे निदान ओळखले, तोच ह्यात…

Read More

एक तत्व – एक नाम ©️

एक तत्व नाम म्हणजे काय? नाम एक आणि तत्व एक असे काही आहे का? तत्व तेच नाम ! नाम तेच तत्व !! तेच मनाला सांगावे दृढ धर. हरी म्हणजे कोण? म्हणजे तेच हे ! हा म्हणजे तोच हरी, (आपल्या) हृदयी असणारा. तोच हृदयी असून, तोच सर्वत्र व्यापक आहे. मी अखंड आहे. मी माझ्या…

Read More

मन शुद्ध ठेवणे ©️

श्री सद्गुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने ही शुद्ध ऐकाल. वृत्ती हीन असेल त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो. “सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. मन सूक्ष्माला सोडून नाही.” मनाला…

Read More

भक्ती साधी अन् सोपी ©️

गोरा कुंभार - खरे पाहिले तर भक्ती साधी सोपी आणि सरळ आहे, पण ती डोळे भरुन पाहता आली पाहिजे. इच्छा असली तर पाहिल. सत भावनेने वाटेला लागल्यानंतर पूर्व संचिताप्रमाणे मिळेल. नाहीतर कितीही ज्ञान सांगितले तरी त्याचा काही एक उपयोग नाही. आताच्या काळात बोलणे फार, पण कृतीला कमी. काहीच दिसत नाही. या ठिकाणी काही माणसे…

Read More

सेवक, सेवेकरी ©️

सेवेकरी सद्गुरु चरणांचे सेवक आहेत. त्याबद्दल मनात वादळ निर्माण झाले म्हणजे मन हेलकावे खाते आणि सद्गुरुना विसरतो, अशा तऱ्हेने तो वाटचाल करतो. सद्गुरुना हे सगळे माहीत असते पण त्याची ते सेवेकऱ्यांना गती देत नाहीत. सद्गुरु कधीही सेवेकर्‍याला विसरत नाहीत. जीवनात वादळ निर्माण झाले, तर सद्गुरूंची आठवण ठेवून नामात गुंग झाल्यास काळाचीही भीती नाही. सेवेकऱ्यांना…

Read More

भक्ती ©️

भक्ती - भक्तीला वाद, तमाशा, डांगोरा पिटणे हे काहीही लागत नाही. भक्ती ही आपोआप आहे. ती जिव्हाळ्याची भक्ती आहे. भक्तीचा जिव्हाळा कशात आहे, हे जर ओळखले, तर त्याला सांगण्याची जरुरी नाही. ज्याने ओळखले, ज्याला पटले तो तिथून दूर जाणार नाही. अनेक अघोरांनी काही जरी सांगितले, तरी तो ऐकणार नाही. त्याला जरी दूर खेचण्याचा प्रयत्न केला,…

Read More

गणपती ©️

मानवाला बुद्धी देणारा कोणीतरी आहे, परंतु कृती करताना, “मी कोणीतरी आहे” अशी त्याची भावना असते. मूर्ती रंगविणे, ती हुबेहुब वटविणे, हे काम तो उत्कृष्टपणाने करतो. पण बुद्धी कुठून निर्माण होते, येते हे त्याला कळत नाही. गणपतीला व्यवस्थित नटवितो, वटवितो, पण जड आकार पाण्यात गेला तरी सूक्ष्म आकार आहे हे कोणी पाहिले आहे कां? तो सूक्ष्म…

Read More

ब्रह्म ©️

पंढरपूर निवासी श्री विठ्ठल – ब्रह्म - ब्रह्म म्हटले म्हणजे त्या ठिकाणी सर्वस्व स्थिरावले जाते. हे उच्च कोटीचे स्थान होय. ज्याला स्थिती स्थापकत्व, त्या ठिकाणी सर्व लय होते, मिलन होते. सद्गुरु मिलन तेच ब्रह्म होय. मानवाचे कोड कौतुक पुरविण्यासाठी त्रिगुणात्मक आकार निर्माण होतो. त्यावेळेला अल्प बुद्धीप्रमाणे जवळ असते ते सांगणे होते. चित् सत् त्याचा आनंद…

Read More

आसन सेवा आणि सेवेकरी ©️

सद्गुरु हेच माझे दैवत, पिता, माता सर्वस्व आहेत. असे जो सेवेकरी जाणतो, त्या सेवेकऱ्यास सर्वांगीण सेवा काय आहे ते कळते. पण काही नुसते सद्गुरूंशी गोड बोलणारे आहेत. अशांची कितीतरी सेवा राहिली आहे, चुकली आहे, पण त्यांनी कधी कोणाला काही म्हटले आहे का, की आपण सेवा का देत नाही? त्यांना माहीत असते, हा सेवेकरी अखेरीस कुठे…

Read More

सद्गुरु, सेवेकरी आणि सेवा ©️

सद्गुरु आणि आपण वेगळे आहोत असे काही आहे का? सद्गुरु समान बनले पाहिजे. ते अंत:र्यामीच आहेत म्हणून आपण बोलता, चालता, नोकरी करता, पण अंत:र्यामीचे तत्व बाहेर पडल्यानंतर, मनाच्या मनमौजा चालतील का? मग आणखी सद्गुरु आणि मी वेगळा आहे असे म्हणता येईल का? सद्गुरु चुणूक देऊन, प्रकृती कडून बोल फेकतात. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी…

Read More

You cannot copy content of this page