सत् तत्व - महाराष्ट्र ही भूमी महान पवित्र भूमी होती. सर्वस्व ऋषीमुनी आपले साध्य साधण्यासाठी या ठिकाणी येत असत. कोपिष्ट मुनि या ठिकाणचे नसून ते दक्षिणेकडचे होते. सिद्धी साधण्यासाठी दक्षिणेकडून ते या ठिकाणी आले. महान तपश्चर्या केली. वरदान मागून घेतले. वरदान मिळाल्यानंतर आपल्या शक्तीचा त्यांच्या ठिकाणी अहंभाव निर्माण झाला. या शक्तीच्या जोरावर त्यांनी कलह घडवून…
आपले जे स्थान आपले जे स्थान कूपी आहे, त्या ठिकाणची गुप्त नदी जी अक्षयाने आपल्या ताब्यात घेतली होती, संदेश आहेत आपणाला, हे सर्वस्व मोकळे करावयाचे आहे. त्याचे सर्वस्व मार्ग, निवेदन करणार आहे. चौकटांच्या वेळीच हे कार्य करावयाचे होते, पण कार्य पूर्ण झाले नव्हते. हे महान असे क्षेत्र आहे. या क्षेत्राला आता फार मोठे महत्त्व मिळणार…
वालावल कूपीचा डोंगर - वालावल या ठिकाणी कूपीच्या डोंगरावर अक्षय नावाची महान अघोरी ज्योत होती. त्याचे प्राबल्य त्या ठिकाणच्या सबंध परिसरात होते. त्याचे सर्वस्व गण प्रत्येक गावी दैवत या रूपाने वावरत होते. अत्यंत रमणीय, आल्हाददायक असे हे क्षेत्र आहे. याच ठिकाणी असणारी एक गुप्त नदी, अक्षय याने आपल्या शक्तीने बंधन घालून पूर्णत्वाने आपल्या ताब्यात घेतली.…
श्री स्वयंभू महाशिवरात्र – जे सत्यमेव आहे, स्वयं तत्त्व आहे, जो प्रत्यक्ष शिव आहे त्याचीच ही शिवरात्र आहे. तोच हा एक दिवस आहे. म्हणजे ज्यांची शिवरात्र आहे, त्यांच्याच ध्यानात मी रममाण असतो. मी जर शिव आहे, तर मग दुसऱ्याची सेवा का करतो? मी कोणाच्या ध्यानात असतो? तर जे स्वयं शिव आहेत, ज्यांचे वर्णन करता येत…
श्री नर्मदा निवासी मालिक – आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका होतात. मग मानवांचे काय? लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही.
भक्तीची अंगे दोन आहेत – (१) एक सत् भक्ती अन् (२) दुसरी असत भक्ती. म्हणून…
दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | चोर आणि साव सारखाची || काही चोर पण आहेत, काही साव पण आहेत. मी कणाकणात भरलेलो आहे. केव्हाही सोडणार नाही. कोणीही सुटणार नाही. असे काहींनी प्रत्यक्षात अनुभवले आहे. ज्यांनी अनुभवले नाही त्याना काही माहीत नाही.
दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्यांनी…
श्री समर्थ मालिक – विषय एकच आहे. भक्ताने आपले कर्तव्य करणे. आत्तापर्यंत कुठला विषय बाकी आहे का? विषय नेहमीच आहे. पण ज्ञान? ज्ञाना पासून प्रकाश ! अजून काही जण प्रकाशित व्हावयाचे आहेत.
एकच विषय - अखंड नाम ! ज्या आसनावरून अखंड नाम मिळाले आहे, त्या अखंड नामात सेवेकर्यांनी कर्तव्यात राहणे. विषय हा गहनच आहे.…
श्री समर्थ मालिक – महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला आहेत हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी काय करतो अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे.…
रुक्मिणी माता – (आषाढी एकादशी) प्रथमच परब्रम्ह तत्त्वाने, आपण ज्यांना परब्रह्म म्हणता (याच ठिकाणी माझी मान लवते, त्यांनी सुद्धा मान लवविली) मग परब्रह्म कोण? म्हणून माझी कर्तव्य मी करीत आहे. पण एवढेच आहे, जे सर्व भूतेषु पश्य ते सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा अलिप्त आहेत. याची गती मिळण्यासाठी कोणाची तरी साथ हवी असते. साथ मिळाल्यानंतर…
गुरुपद हे अखंड त्रिकाला बाधित आहे. ते कोणीही निर्माण केलेले नाही. कोणीही निर्माण करविता नाही. असे हे स्वयं आणि अखंड पद आहे. याची महती, महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांची वाणी, त्यांचे आदेश याला अतिशय महत्त्व आहे.
गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे. हे अनाठाई जाणार नाही. स्वयंपद गुरुपदाच्या मुखातून निघाले, तरी पण ते…
सत् भक्तीचा प्रकाश - आपल्या भारत भूमीमध्ये प्रत्यक्षात भगवंताने अनेक अवतार नटवून त्याला पुनीत केलेले आहे. असा हा महान पवित्र व मंगलमय देश आहे. याच भारत भूमीमध्ये अनेक ऋषी, मुनी, महामुनी व तत्वज्ञानी जन्माला आले. सर्व विद्येमध्ये पारंगत असे ज्ञानी, साधू, संत, आचार्य, महंत याच भारत भूमीमध्ये निर्माण झाले.
एकेकाळी या देशामध्ये शूर, वीर,…
“मन हे मज पासोनी जाण |” मग मन आळवले असा योगी कोण? हे जरी मजपासूनही असले तरी प्रत्येकाची प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे का? आणि म्हणूनच मनाची ठेवण, त्या तऱ्हेने चाचपणी असते. प्रकृती शुद्ध नाही मग मन गढूळ होणारच ! प्रकृतीच्या तरंगामुळे मन चल बिचल होते. भूमी शुद्ध झाल्यानंतर कृतीमान असले पाहिजे, अन् हे जर टिकविले,…