दिनांक:१४. १०. ७५ च्या प्रवचनातून श्री समर्थ मालिक सांगताहेत, “ज्यावेळी या पृथ्वीवर काहीही नव्हते, मग हे उत्पन्न झाले कसे? कोणी केले? याचा कर्ता कोण ? मानवाचे जगताच्या पृष्ठभागावर अस्तित्व असावे म्हणून हे केले. मी जगात वावरतो याचा उहापोह कोणी केला असता? एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे.
ओंकार बीज कसे निर्माण झाले कोणी फेकले याची…
दिनांक: १४. १०. ७५ च्या आपल्या एकचित्ततेत सांगताना जगन्माता म्हणते, “अदृष्याला कोणी पाहिले आहे का? अदृष्याला मालकांच्या कृपेने पाहता येते. तेही आकारीच रूप आहे. आकारी स्वरुपीच वाटचाल करायला सांगते. मग अदृष्याची गती आणि त्यांचे ठिकाण मिळते व ओळख होते.
आम्ही जरी महान असलो तरी उत्पत्ती करणारे तेच आहेत. माझ्याही अंत:र्यामी तेच आहेत. त्यांना विसरून…
ओंकार हे बीजच नसते तर काही पाहता आले नसते. म्हणूनच ही जी मां आहे हे सतच आहे. तुमचे सद्गुरु बाबा जे आहेत, ते ओंकार स्वरूपीच आहेत, अन ओंकार हीच महामाया आहे. ही माया सर्व ठिकाणी विखुरली आहे. ते एकच तत्व आहे. ते तत्त्व नसते, तर आकार निर्माण झाला असता का?
ते अनेक तऱ्हेने वावरू…
श्री विठ्ठल – आपल्या दिनांक: २२ जुलै १९७२ च्या प्रवचनातून सांगतात, “एक (१) म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एकलय होतो. मग निर्गुण निराकार ! त्यांनी अनंत तत्वे या पृथ्वीतलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य…
ओंकार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे.
ओंकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे.
ओंकार साधना याचा अर्थ ओमकाराच्या उच्चारातून, ओमकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ओंकार साधना अत्यंत…
ॐ कार साधना – अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. आरोग्य रक्षणासाठी असलेली अॅलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती ही एकच चिकित्सा पद्धती नाही, तर प्राचीन काळापासून भारतामध्ये विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती प्रचलित होत्या, त्यामध्ये आयुर्वेद, सिद्धऔषधी, योग, प्राणायाम, चुंबक चिकित्सा इ. अनेक प्रकारच्या पॅथी म्हणजेच पद्धती होत्या.…
श्री समर्थ मालिक - प्रथम चैतन्य आकार बिंदू, त्यापासून धुनधुनकार ! धुंधुंकारापासून ओंकार, नंतर हा जगताचा पसारा झाला. ओंकाराची निर्मिती झाल्याशिवाय जगाची निर्मिती नाही. धुंधुंकारापासून ओंकार अन ओंकाराचे पोटी महामाया. महामायेपासून त्रिगुण निर्माण झाले. नंतर सृष्टीची उत्पत्ती झाली. मग ओंकार हे तत्व नसते, तर तुम्ही कोणाला पाहिले असते, म्हणूनच तिला महामाया म्हटलेले आहे. मग…
सेवेकऱ्यांची भावना उच्च दर्जाची आहे हे मी जाणतो. पण कोणतेही कर्तव्य योगायोगाने होते. संचिताप्रमाणे कोणतीही वस्तू मिळते. भावना असते, मी एकदम, सद्गुरु सानिध्याने आणखीन विवेचन करीन. काहीतरी चमत्कार दाखवीन असे सुद्धा वाटते. सत् कर्तव्य परायनतेणे जे कष्ट केलेले असतात, त्या सत् कर्तव्याचे फळ सेवेकऱ्याला अवश्य मिळते. पण केव्हा आणि कधी? हा प्रश्न आहे. पण तेच…
श्री समर्थ मालिक - जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, वर्म जाणतो त्याला ठाव लागतो. तोच अंत घेतो. अंत घेतला तरी बांधून ठेवत नाही. ठेवता येत नाही. त्या पात्रतेचा सेवेकरी असला पाहिजे. त्यांच्यात पूर्ण रममाण, एकचित्त झाला पाहिजे. मग त्याला काहीच सांगता येणार नाही आणि अशांचे सेवेकरी कोण? अशांचे सेवेकरी आपण असताना सुद्धा काहींच्या मनात शंका निर्माण…
प्रार्थना – प्रा म्हणजे काय? प म्हणजे काय? ना म्हणजे काय? प्रार म्हणजे काय? आणि थ म्हणजे काय? न म्हणजे काय? म्हणजेच परात्पर, चराचर, क्षराक्षर असे ते परात्पर तत्व !
परात्पर तत्व ! ते कोणी निर्माण केलेले नाही. घडविलेले नाही. घडविणारा नाही. असे तत्व त्याला प्रार्थ असे म्हटले आहे. प्रार्थना म्हणजे ज्याचा अर्थ…
मायेत, संसारात लपेटल्यानंतर, ब्रह्म आधी का माया आधी? ब्रह्माच्या मागे लागल्यानंतर माया पाठीशी येईल. म्हणूनच सत भक्ती हीच अद्वैत भक्ती आहे. अद्वैत भक्तीने जाईल, त्याला सर्व ठिकाणी एकच दिसेल. सताची गती घेतल्यानंतर ते जगभर कसे वावरते ते समजेल. सद्गुरु सर्व ठिकाणी फिरवित असतात.
आपण आपल्या सद्गुरु चरणात निमग्न होऊन पुढे पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न…
मानव षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटलेला असतो. अहंकाराने क्रोधाने बरबटलेला असतो. त्याचा क्षय करणारे असे तत्त्व ! त्यालाच म्हटलेले आहे विषय !
याचा क्षय कोण करतो? तर ईश्वर ! सेवेकरी करेल का? सेवेकर्याच्या ठिकाणी लिनता, नम्रता, शांती हा त्रिवेणी संगम असेल तर क्षय करायला वेळ नाही. सेवेकरी सद्गुरु आदेशाप्रमाणे वागत असेल तर क्षय करण्यास वेळ नाही. द्वैत…