श्री गुरुदेव पितामह म्हणतात, "ॐ या प्रणवातच सर्वस्व स्थिती बहरलेली आहे."
सताने दिधलेले प्रणव मानवाच्या लक्षात रहात नाहीत. आकलन येणे सताने आपणांस आपणाप्रत घेऊन ठेवले आहे. जर सताने तुम्हास आपणाप्रत घेऊन ठेवले नसते, तर तुम्ही स्थिर राहू शकणार नाही. सताने आपली जी स्थिती आहे, ती आपणाप्रत ठेवली आहे. ज्या अवधीत सताने आपल्या शिरकमलावर हस्तस्पर्श…
श्री समर्थ मालिक - मानव धर्म श्रेष्ठ आहे. या ठिकाणी नाम सर्वस्व आहे. सहज साधारण नाम म्हणजे भक्ती ! नाम कोणत्या तऱ्हेने झाले यावर लक्ष देणे. नामासारखी गोडी नाही. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही. आपले जीवन कोणत्या तऱ्हेने जात आहे, हे फक्त अखंड नामाने लक्षात येते आणि म्हणूनच मुख्य नाम निर्माण झाले.
नाम…
“मन हे मज पासोनी जाण |” मग मन आळवले असा योगी कोण? हे जरी मजपासून असले तरी प्रत्येकाची प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे का? आणि म्हणूनच मनाची ठेवण ज्या तऱ्हेने, त्या तऱ्हेने चाचपणी असते. प्रकृती शुद्ध नाही मग मन गढूळ होणारच ! प्रकृतीच्या तरंगामुळे मन चल बिचल होते. भूमी शुद्ध झाल्यानंतर कृतीमान असले पाहिजे. अन् हे…
एकादशी या महान महत्वाच्या दिवसाचा अर्थ काय? प्रथम सेवेकर्यांने सत बनण्याचा प्रयत्न करणे. पूर्व संचिताप्रमाणे मानवाने, सेवेकऱ्याने सत् बनण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु तत्त्व कोण आहे? ज्या आकाराला आपण शरण आहात, ते जे तत्व बहाल करतात, चुकलेली जागा दाखवतात, त्यांच्या ठिकाणी रममाण होणे, दहा इंद्रियांचा संयम करून एकाग्र करणे व अकराव्यात लय करणे. निमग्न करणे. मग…
श्री विठ्ठल - आषाढी एकादशी - दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी?
जे…
श्री समर्थ मालिक - दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्यांनी तुम्हाला प्रकाश दिला आहे. तुम्ही स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे.
या दरबारात कोणी चोरी केली तर मी कणाकणात भरलेलो आहे. केव्हाही सोडणार नाही. तो सुटणार नाही. असे काहींनी प्रत्यक्षात…
श्री समर्थ मालिक - अनेक वेळेला प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा याची ओळख होऊ शकते. पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही. गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा, किती फरक पडतो याचा सेवेकर्यांनी विचार करा. हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहता म्हणजेच द्वैत भावनेने पाहणे…
श्री समर्थ मालिक – मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात. मग सेवेकरी अभिन्न का होत नाही? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये? ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला नाही. त्यांने सताचे बोल ऐकले नाहीत. मान अपमानाला जखडला की हेवेदावे…
श्री नर्मदा निवासी मालिक – आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका होतात. मग मानवांचे काय? लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही.
भक्तीची अंगे दोन आहेत – १) एक सत् भक्ती अन् (२) दुसरी असत भक्ती. म्हणून…
बाबा - सर्वस्व सृष्टीची रचना करणारे आपण, ॐ कार ध्वनी फेकणारे आपण अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे आपण !
मालिक - आपण म्हणता हे खरे आहे. पण वाईट वाटते एकच की, सेवेकर्यांनी हे घेतले नाही. जर हे घेतले असते तर हे शहर दुमदुमून सोडले असते. सेवेकर्यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना…
श्री समर्थ मालिक – महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला आहेत. हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी काय करतो अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे.…
ही प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी त्या पात्रतेला अजून गेलेले नाहीत. पण मला लाघव करण्यासाठी चांगला वाव मिळतो, म्हणून ते कर्तव्य मी मायेकडून करून घेतो.
मी करूनही अकर्ता ! सुखदुःखाच्या वेगळा आहे. वेगळा असून सुद्धा पाप पुण्याच्या निराळा आहे. सर्वव्यापक असूनही…