आकार हा तत्त्वाच्या रहित आहे का? मग तत्त्वाने आकार पोसला गेला की आकाराने तत्व पोसले? मग आपणाला काय पाहिजे? तत्व पाहिजे का? यामुळेच सेवेकरी फसला जातो.
सत् हे आकारी आहे अन् आकारा रहित पण आहे. जर आपणाला त्रिगुण रहित पाहिजे असेल तर त्याप्रमाणे वाटचाल करणे. माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे…
श्री राम नवमी – माझा आजचा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यसाठी जन्म अवतार नटवलेले तत्त्व तो मीच आहे. मला जी कर्तव्य सांगितली, ती करीत करीत मी लयबद्ध झालो होतो. सताला पूर्णत्वाने संरक्षण देणे व असताचा नि:पात करणे, हीच भूमिका घेऊन सर्वस्वाला सांभाळीत ज्याच्यासाठी जन्म अवतार नटवला…
श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला, मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते ही मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे, अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले.
हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर म्हणजे वेगळे तत्व आहे असे म्हणणारे मानव…
काही सेवेकर्यांनी किती कर्तव्य बजावले आहे? तर शून्य ! कर्तव्याची वाटचाल थोडी पण बडबड जास्त असते, म्हणून सेवेकऱ्यांनी जर शंका आणल्या तर त्या सद्गुरूंना माहीत असतात. जे काही करतो ते सर्व सद्गुरु जाणतात. थोडासा त्रास सहन केला पाहिजे, म्हणून त्या संतांनी असे म्हटले आहे. पूर्वीच्या संताप्रमाणे कृती करा अन् चौकटीत बसा.
सेवेकरी कसाही असो,…
श्री समर्थ मालिक - सुख पाहता जवापाडे | दुःख पर्वता एवढे || सद्गुरुं शिवाय दुःखाचा भार कोणीही घेऊ शकत नाही अन् शकणार नाही. सद्गुरु नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीवर असतात. कोटी वर्षे होऊन गेली आहेत.
भक्ताला आपले दुःख पूर्णत्वाने भोगावे लागते. तरीसुद्धा त्या दुःखाचा अर्धा भाग सद्गुरु वाहत असतात. आसनावरुन अनुग्रह देताना, सेवेकऱ्यांना काही तत्वे…
श्री समर्थ मालिक - ज्या ठिकाणी पाण्याचा जिव्हाळा आहे, त्या ठिकाणी खोदण्याची आवश्यकता असते काय? आपोआपच पाणी दिसते. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला आहे, त्याला ती आपोआपच मिळते. पण जिव्हाळा मागून मिळत नसतो. मागितला तरी मिळणार नाही. तर तो कर्मसंचिताप्रमाणे मिळतो. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, तोच दैवाचा पुतळा आहे. ते बोल कोणी फेकले? ते बोल चुकीचे…
अखंड शक्तीची, महान शक्तीची ओळख करून देणारे व चुकलेली जागा दाखविण्यासाठी कोणीतरी आकारी असावा लागतो. मग दैवत श्रेष्ठ का चुकलेली जागा दाखविणारे श्रेष्ठ? मी जर श्रेष्ठ म्हणावे, तर मी कोणाला तरी शरण आहेच. मग मी श्रेष्ठ कसा?
अनंत लाघवी शक्ती आहे. ती लाघव करावयास लागली, तर अंत मिळणार नाही. थोडीशी अहंकाराची झलक आली की…
श्री विठ्ठल - सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्य प्रविण असतो.
सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा. …
श्री समर्थ मालिक - सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे? जड आहे, स्थूल देह आहे, म्हणजेच त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही.
मी सगुण आहे, निर्गुण पण आहे, पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते,…
परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे. आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे.
याची वाढ कोणी करावयाची? मानवी तऱ्हेने त्रास झाला तर आसना जवळ सांगता, पण…
श्री समर्थ मालिक - यश हे अवश्य आहे, पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्षयुक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्षयुक्त भावना असते. पण जोपर्यंत कर्तव्य होत…
श्री संत नामदेव महाराज - सद्गुरु क्षणात निराकारी बनतील, क्षणात आकार धारण करतील. सदोदित स्थानवंत असे हे तत्व आहे. असे असून सुद्धा, निर्गुण निराकार पदानेही व्यवहार करतात. माझ्यासारख्या सेवेकऱ्याने आणखी किती वर्णन करावे? म्हणून येथील सेवेकरी महान भाग्यवान आहेत. कोणी सद्गुरूंचा अंत लावला आहे का? कोणी म्हणतो आम्हाला दर्शन नाही, कोणी म्हणतो प्रकाश…