आसनाधीस्त म्हणतात, “आसनाधीस्तानी कोणावर अवलंबून राहावे?” भगवंत भक्तावर अवलंबून असतो व भक्त भगवंतावर अवलंबून असतो. मग आता तुमच्या सद्गुरूंनी किंवा आसनाधीस्तानी कोणावर अवलंबून राहावे?
सेवेकऱ्यांनो, माझे बोल शांत आहेत. सद्गुरु ज्ञान देतात. तुम्हीच सांगावे, आसनाधीस्तांनी कोणावर अवलंबून राहावे? भक्तावर अवलंबून राहावे? भक्त आसनाधीस्तांचे प्रणव गुप्त ठेवतात का नाही? गुप्त पत्र वाचलेल्या दिवशी किती सेवेकरी हसत होते व किती सेवेकरी गप्प होते? जे हसले ते का हसले, कोणाला हसले ते मला माहित आहे. हा मुद्द्याचा प्रश्न आहे.
आसनाच्या सानिध्यात का हसला? कोणाला हसला? मग जे ज्ञान दिले, त्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने घेतला आहे का? ज्ञान, उपयोग व जपणूक ठेवली काय? पालन चांगल्या तऱ्हेने का नाही? कुठे हसला, कोणाला हसला व का हसला? याचा पूर्ण विचार करून शोधन करणे.
स्पष्टीकरण मी आसनाधीस्तांना विचारू शकतो किंवा आसनाधीस्त मला विचारू शकतात. सानिध्यात, कर्मसंचिता मध्ये ज्ञान जपणूक करता येत नाही.
सेवेकरी नाते श्रेष्ठ व पवित्र राखू शकले नाहीत. माझा नाईलाज आहे. सेवेकरी दिलेल्या ज्ञानात तल्लीन असतात काय? ज्ञान बहाल केलेले आहे. त्याचा उजाळा करू लागला तर वेळ प्रसंग येतील तेव्हा स्वतः सेवेकरी सत कृतिमान होऊन दूर हटवू शकेल. सेवेकरी हा शंकेत आहे कि शंकेच्या रहित आहे? म्हणजे अजून सद्गुरु व सत ओळखले असे म्हणावे की नाही? तुमच्या मायेसाठी, सुखदुःखांसाठी सत् आहे, पण भोगत्व कोणी भोगायचे? याच्यातून पार पडणे भाग आहे. (समाप्त) ©️
