आजचे दिवस हे फार अहंकारात चाललेले आहेत, अन् या अहंकारावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र भूमी शापातून मुक्त करावयाची आहे. तेव्हा ही घुसळण झाल्याशिवाय भूमी शुद्ध होणार नाही. ही घुसळण करणारच हे मात्र सेवेकर्यांनी विसरता कामा नये.
दुसरी गोष्ट, असे होणार, तसे होणार हे म्हणणे साफ चुकीचे आहे. पांडवांसारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे…
श्री समर्थ मालिक - या ठिकाणी ज्ञानच भरलेले आहे. घेणारा पाहिजे. ज्ञान साधे, सोपे, सुलभ तितकेच कठीण आहे. कठीण कोणाला अन् सुलभ कोणाला? करील त्याला सोपे आहे, न करील त्याला कठीण आहे.
मी ज्यावेळेला प्रत्यक्षात अवतार कार्य नटवले ते कोणत्या कारणाने घेतले? त्यावेळेला सेवेकरी, मानव, प्राण्यांना भयंकर त्रास होता. तिच परिस्थिती आता निर्माण झालेली…
स्वधर्म हे निधान आहे. धर्म म्हणजे कोणता धर्म? धर्माच्या व्याख्या दोन आहेत. धर्म म्हणजे मानव धर्म. मानव भिक्षुकाला धर्म देणार तो ही धर्म आणि तिसरा धर्म सत्कृतीने जाणे आणि पांडवांमध्ये धर्म होता तो ही (नाव) धर्म ! म्हणजे धर्म कोणता?
धर्म म्हणजे सत् धर्म ! याची तुलना एकाच चाकोरीतून जाते. मानव धर्मासारखा श्रेष्ठ धर्म…
ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे, राजाची कांता दारोदारी भीक मागत फिरेल का? तिच्या मनाजोगी सिद्धी पावेल की नाही? का तो राजा भिक्षांदेही असतो? पण कल्पतरू तळवटी बसल्यानंतर, त्याची भावना कुठे कुठे जाते?
कल्पतरू तळवटी….. दोन मार्ग आहेत. जो सत् कल्पवृक्षाखाली बसला, तो सत मार्गाने जाणारा असतो. जो अघोर, कल्पवृक्षाखाली बसला, तो अघोर कल्पनेच्या पाठीमागे लागून…
स्वधर्म म्हणजे काय? अन् परधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे जो सत पूर्ण आहे, ज्याच्या मुखावर सताची झलक असते, ज्याची सत कृती आहे, सत भक्तीत रममाण आहे, तोच खरा स्वधर्म होय. असा भक्त भिक्षां देई असा नसतो. त्याची इच्छा पूर्ण होते. तो स्वयं तत्वावर अवलंबून असतो. जो सत् मार्गाने जातो त्याला दुसरीकडे भिक्षा मागण्याची जरुरी नसते.…
आकार लय केव्हा होतो? त्यात रममाण झाल्यानंतर आकार राहतो का? असे सेवेकरी केव्हा बनणार? सेवेकऱ्यांना सांगायला लाज वाटते का? अशी अखंड तिजोरी बहाल केली असताना सुद्धा आसनाधीस्तांनी सांगितले की मी नामातीत आहे. म्हणूनच सेवेकर्यांनो खजिना लुटा. सेवेकर्यांनो हे द्वार तुम्हाला मोकळे आहे. याला लुटणारा पाहिजे.
अजून सेवेकऱ्यांचे हेवे-दावे गेलेले नाहीत. मी आणि तू रहित…
या विश्वाची घडण कशी आहे? विश्व म्हणजे तरी काय? हे विश्व बीजरुपी आहे का बिजारहित आहे?आकाराच्या रहित जे दर्शन मिळते ते आपणाला पाहिजे आहे का? त्यात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मात्र ते बीज आहे की काय आहे याचे भान रहात नाही.
मसुरेप्रमाणे मोतीयाचे परी | असे दर्शने द्वारी……| बीज दाता मीच आहे, असे म्हटले…
पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जी ज्योत प्रथम सत् भक्तीने जाण्याचा प्रयत्न करते. त्या सत् भक्तीने जाणाऱ्या किंवा मार्ग आक्रमण करीत असणाऱ्या ज्योतीला अनुभव येतात. तद्नंतर पुढे त्याला त्रास जरी झाला, तरी पूर्वीच्या अनुभवामुळे सत् भक्तीच्या प्रकाशाला तो विसरत नाही. कारण जे पाहिले नाही ते त्याला पहावयास मिळते. सत् भक्तीच्या प्रकाशात तो डुंबत असतो. त्याचा निश्चय ठाम असतो.…
निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती गोष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी वेगळी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही.
प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो. त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो. महान पर्वत, काटे कुटे, जंगल,…
श्री समर्थ मालिक – चमत्कार म्हणजे भक्ती नव्हे. अघोर मानवांसाठी चमत्कार करावे लागतात. आपल्या भक्तीसाठी भुरट्या चमत्कारां सारखी आवश्यकता नसते, तर अखंड चमत्कारांची आवश्यकता आहे. हे चमत्कार पाहिजेत, झाले पाहिजे असे म्हणण्याची आवश्यकता नाही. चमत्कार आपोआप होतात. सेवेकऱ्यांची थोडी पाहणी करावी लागते. अघोरांना काही माहीत न पडता गुपचूप कार्य करावयाचे होते. त्या अघोरांकडून भरपाई करून…
सत् कोठे आहे? सद्गुरु म्हणजे काय? त्यांची ओळख करून घेणे, ओळखणे, मग तोच सत् भक्तीचा प्रकाश अन् त्याच प्रकाशाच्या अनुसंधनाने वाटचाल करणे. त्याच प्रकाशात सद्गुरु सर्व ठिकाणी फिरवून आणतात. त्या मार्गाने सेवेकरी जाईल, त्यावेळेला त्याला वाटेल हा सत् भक्तीचा प्रकाश आहे. पण कष्ट करून मिळाला तरच त्याला मोल आहे, किंमत आहे. पण सहजासहजी मिळाला तर…
सत मार्गाने जाणारा मानव हा पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जात असतो. नवमास भरल्यानंतर तो जन्माला येतो. त्यावेळी त्याला नाव गाव काही सांगितले नाही, कोणाचा आहे हे सांगितले नाही. १८ वर्षाचे वयात आल्यानंतर तो लगेच भक्तीला लागला आहे का? जर त्याची भावना शुद्ध सात्विक असेल, अन त्याच्या मनात जगात ईश्वर आहे ही भावना निर्माण झाली, मगच तो भक्तीने…