Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

चमत्कार म्हणजे भक्ती नव्हे ! ©️

चमत्कार म्हणजे भक्ती नव्हे ! ©️

श्री समर्थ मालिक – चमत्कार म्हणजे भक्ती नव्हे. अघोर मानवांसाठी चमत्कार करावे लागतात. आपल्या भक्तीसाठी भुरट्या चमत्कारां सारखी आवश्यकता नसते, तर अखंड चमत्कारांची आवश्यकता आहे. हे चमत्कार पाहिजेत, झाले पाहिजे असे म्हणण्याची आवश्यकता नाही. चमत्कार आपोआप होतात. सेवेकऱ्यांची थोडी पाहणी करावी लागते. अघोरांना काही माहीत न पडता गुपचूप कार्य करावयाचे होते. त्या अघोरांकडून भरपाई करून घ्यावयाची होती. म्हणजे त्या मानवाचे कर्तव्य करण्यास मला विलंब लागत नाही.

कोणतेही फळ देताना अनंत वेळ विचार करावा लागतो. तदनंतरच ते फळ दिले जाते. फळ दिल्यानंतर ते परत घेताना अनंत वेळ विचार करावा लागतो. फळ दिले तर ते घ्यावे कोणत्या हेतूने, त्यासाठी पूर्वजन्मीचे संचित बघावे लागते. देताना सोपे पण घेताना विचार करावा लागतो. म्हणून कोणतेही कर्तव्य करण्याला विलंब लागतो. यामुळे विचार निर्माण होतात.

आमचे दोघांचे (सद्गुरु आणि सत् ) वादविवाद होतात, पण आमचे वादविवाद कोणालाही कळणार नाहीत. आमचे वादविवाद जरी झाले, तरी आमचा अबोला राहणार नाही. हे कर्तव्य वादविवादाने केले जाते, होत असते. त्याप्रमाणे कर्तव्याची दिशा आखली जाते.

या आसनाच्या सेवेकऱ्यांच्या पूर्व संचिताप्रमाणे भक्तीचे मूळ अखंड तिजोरी पदरात टाकली असताना सुद्धा त्याला सांभाळता येत नाही. कोणी कशासाठी रडतो, तर कोणी कशासाठी रडतो, पण सद्गुरु सर्वस्व पहात असतात. सेवेकरी ठाम पाहिजे. ध्यानधारणा पाहिजे. त्याला मागणी करण्याची आवश्यकता नाही. स्वतःचे मनावर ताबा ठेवता येत नाही, मग बाकीचे काय करणार? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page