सत् कोठे आहे? सद्गुरु म्हणजे काय? त्यांची ओळख करून घेणे, ओळखणे, मग तोच सत् भक्तीचा प्रकाश अन् त्याच प्रकाशाच्या अनुसंधनाने वाटचाल करणे. त्याच प्रकाशात सद्गुरु सर्व ठिकाणी फिरवून आणतात. त्या मार्गाने सेवेकरी जाईल, त्यावेळेला त्याला वाटेल हा सत् भक्तीचा प्रकाश आहे. पण कष्ट करून मिळाला तरच त्याला मोल आहे, किंमत आहे. पण सहजासहजी मिळाला तर त्याचे महत्त्व वाटत नाही. त्याला काय म्हणावे? म्हणून सेवेकर्यांनी सद्भक्तीच्या प्रकाशाने जाण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे.
सत् कोठे आहे, कशात आहे याचा आतापर्यंत क्वचितच मानवांनी शोध लावला आहे. बहुतेक मानव असेच भटकत आहेत. काही मानव सत् भक्तीत रममाण झाले असले तरी त्यांच्या मनाच्या कोलांट्या उड्या चालत असतात. म्हणून सत भक्तीने जाणारी, पथ्य सांभाळणारी ज्योत असेल, तर मग मात्र हाच सत् प्रकाश म्हणणे योग्य आहे. बोलता येते पण बोलापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. तो बोल कृतीत आणला पाहिजे. मग मात्र सत् भक्तीचा प्रकाश याला कोणीही लोपविणार नाही.
आज भक्तीचा प्रकाश इतर कोणालाही दिसणार नाही. ज्याला सापडला तो मात्र यात रममाण होतो. तेव्हा सत् भक्तीच्या प्रकाशाने वाटचाल करणे आद्य कर्तव्य आहे.
सत् भक्तीचा प्रकाश अन् सत् भक्तीने प्रकाश ! म्हणूनच त्याप्रमाणे वाटचाल करणे हे सेवेकऱ्याचेआद्य कर्तव्य आहे. (समाप्त)©️
