Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

निश्चयाचे ऐसे बळ | ©️

निश्चयाचे ऐसे बळ | ©️

निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्‍याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती गोष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी वेगळी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही.

प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो. त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो. महान पर्वत, काटे कुटे, जंगल, झाडी अशा मार्गातून प्रवेश करीत निघाला तरी त्याला त्याचे दुःख वाटत नाही. कारण त्याला महान गोष्ट प्राप्त करून घ्यायची असते. काही झाला तरी तो मार्ग भूलत नाही. तदनंतर त्याला ती महान गोष्ट प्राप्त झाल्यानंतर समाधान वाटते. मग म्हणतो मी प्राप्त करून घेतली की नाही?

अशी त्याला ग ची पीडा होते. अहंकार निर्माण होतो. त्याप्रमाणे सत् भक्तीसाठी आपण त्या भक्तीच्या अनुसंधनाने मिळालेला सत् भक्तीचा प्रकाश, ती योगीयाची खूण योगीच जाणतो. सत् भक्तीच्या मार्गाने जाऊ लागला, त्याला अनुभव येऊ लागला, अनुभव घेऊन तृप्त झाला, मग तो त्या मार्गाने जाण्याचा स्वीकार करतो. पुढे पुढे गेल्यानंतर अडी अडचणी निर्माण होतात. त्रास होतो. त्रास वाटू लागल्यानंतर अनुभव जरी आला असला तरी त्याचा विसर पडून मार्ग सोडतो का तो? ©️

You cannot copy content of this page