श्री विठ्ठल - जे मागायचे ते मागत नाहीत, म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही. एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही, जर रममाण झाला असता तर मला गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती. आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे.
मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन…
श्री विठ्ठल - जे मागायचे ते मागत नाहीत म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही. एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही, जर रममाण झाला असता तर मला गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती. आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे, मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन केले…
श्री विठ्ठल - दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे ते…
श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने - सर्वस्व सृष्टीची रचना करणारे आपण, ॐ कार ध्वनी फेकणारे आपण अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे देखील आपण ! पण वाईट वाटते एकच की, सेवेकर्यांनी हे घेतले नाही. जर हे घेतले असते तर स्थिती वेगळीच असती. सेवेकर्यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना ही संपत्ती…
श्री समर्थ मालिक - यश हे अवश्य आहे, पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्ष युक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्ष युक्त भावना असते, पण जोपर्यंत…
श्री समर्थ मालिक - प्रथम चूक करावयाची आणि नंतर क्षमा मागवयाची, क्षमा करा, क्षमा करा. त्या क्षमेला अंतही नाही आणि पारही नाही. ज्या दिनाला शरण गेलात, त्याचे आदेश संदेश पाळणे हे सेवेकर्याचे कर्तव्य आहे की नाही? एक दोन अशा कितीतरी चुका आहेत. सर्वस्व क्षमेचाच पसारा मांडलेला आहे. म्हणजे तत्त्वात ते रममाण, लिन झालेत का? त्यांनी…
श्री समर्थ मालिक - ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर अखंड तत्व, तेथून धूनधूनकार, अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. तोच ओंकार ! आकार हा ओंकार स्वरूप झाला मग प्रश्नच उरत नाही. मग तत्व समान झाले.
प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. तत्व…
दिवा कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्याने तुम्हाला प्रकाश दिला आहे. प्रकाश तुम्ही स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे. असे असताना सेवेकर्यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे, पण या ठिकाणी जे घडते ते कोणीतरी पाहते. हे लक्षात ठेवा. सेवेकरी बोलून जातो, घडण घडते.…
सर्वस्व सृष्टीची रचना करणारे, ॐ कार ध्वनी फेकणारे, अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे सत् ! हे सेवेकर्यांनी घेतले नाही, जर हे घेतले असते तर?
सेवेकर्यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना ही संपत्ती त्यांनी का लुटू नये, भंडार का लुटू नये, याची गोडी सेवेकर्यांना का असू नये?
आहे म्हणावे तर…
याप्रमाणे सेवेकरी होऊ लागला तर त्या ठिकाणी लाघवीचे काही चालत नाही. मीच थोडीशी पाहणी करतो. सेवेकरी तत्त्वाच्या ठिकाणी ठाम झाले तर मला काही करता येत नाही. मी आकारी आहे अन निराकारी पण आहे. पण एकच म्हणावयाचे, जे आकाराकडून संदेश मिळतात, सांगणे होते त्याची जोपासना सेवेकर्यांनी केली आहे की नाही कोण जाणे. तरी सेवेकर्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तणूक…
अनेक वेळेला प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा याची ओळख होऊ शकते, पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही.
गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा, किती फरक पडतो याचा सेवेकर्यांनी विचार करा. हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहता म्हणजेच द्वैत भावनेने पाहणे होय. त्या ठिकाणी…
श्री समर्थ मालिक – || तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न || मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात, मग सेवेकरी अभिन्न का होत नाहीत? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये?
ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला नाही. त्यांने सताचे बोल…