Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

श्री ज्ञानेश्वर माऊली….. प्रवचन (१) ©️

श्री ज्ञानेश्वर माऊली….. प्रवचन (१) ©️

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी !
तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!

   मानवाला चार अंगे आहेत - स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण !  या चारही देहातून तो उद्धार करू शकतो. केव्हा? तर ज्या ठिकाणी शरण जायचे, त्या ठिकाणी तो पूर्णत्व शुद्ध पाहिजे. द्वैत भावना, संशय, कल्पनारहित जो असेल तोच सत् पाहू शकेल, इतरांस तो अधिकार नाही. 

   हल्लीच्या मानवांनी  याचे विवरण केलेले दिसत नाही. 

   देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! याचा अर्थ असा नव्हे की, गळयात माळ घातली की तो गुरु झाला. मग त्याने पंढरीला जाण्यास सांगावे आणि विठ्ठलाच्या दारी जाऊन, तेथें उभे राहून आळवण्यास सांगावे. परंतु पंढरीतच देव आहे का? पंढरीला गेल्यानेच देव भेटतो कां? तर असे नाही. 

   पंढरीच्या विठ्ठलाचे तत्व सताने निर्माण करून येथे कार्याकरीता पाठविले आहे. 

   जर विठ्ठल मानवाला मोक्षाप्रत नेऊ शकेल असे जर आहे, तर नामदेवांना गुरु करण्याची आवश्यकता का भासावी? तर मोक्षाप्रत जाण्यासाठी श्री गुरू, सद्गुरु माऊली हेच सर्वस्वाचे निधान आहे. हेच सर्व ठिकाणी व्यापून अलिप्त आहेत..... पुढे सुरु ©️

You cannot copy content of this page