Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री ज्ञानेश्वर माऊली….. प्रवचन (१) ©️

श्री ज्ञानेश्वर माऊली….. प्रवचन (१) ©️

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी !
तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!

   मानवाला चार अंगे आहेत - स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण !  या चारही देहातून तो उद्धार करू शकतो. केव्हा? तर ज्या ठिकाणी शरण जायचे, त्या ठिकाणी तो पूर्णत्व शुद्ध पाहिजे. द्वैत भावना, संशय, कल्पनारहित जो असेल तोच सत् पाहू शकेल, इतरांस तो अधिकार नाही. 

   हल्लीच्या मानवांनी  याचे विवरण केलेले दिसत नाही. 

   देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! याचा अर्थ असा नव्हे की, गळयात माळ घातली की तो गुरु झाला. मग त्याने पंढरीला जाण्यास सांगावे आणि विठ्ठलाच्या दारी जाऊन, तेथें उभे राहून आळवण्यास सांगावे. परंतु पंढरीतच देव आहे का? पंढरीला गेल्यानेच देव भेटतो कां? तर असे नाही. 

   पंढरीच्या विठ्ठलाचे तत्व सताने निर्माण करून येथे कार्याकरीता पाठविले आहे. 

   जर विठ्ठल मानवाला मोक्षाप्रत नेऊ शकेल असे जर आहे, तर नामदेवांना गुरु करण्याची आवश्यकता का भासावी? तर मोक्षाप्रत जाण्यासाठी श्री गुरू, सद्गुरु माऊली हेच सर्वस्वाचे निधान आहे. हेच सर्व ठिकाणी व्यापून अलिप्त आहेत..... पुढे सुरु ©️

You cannot copy content of this page