Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

मी कुठे प्रगट होईन, कुठे नाही…©️

मी कुठे प्रगट होईन, कुठे नाही…©️

श्री समर्थ मालिक – सद्गुरु चरण ज्यांना कळले आहे, त्यानांच कळले आहेत. असेही काही मानव म्हणतात कि हि गुरुगीता स्वयंभूनेच लिहिली आहे का? म्हणूनच एका संताने गीता लिहिली आहे. त्याने अनुभव सिद्धतेनेच लिहिले आहे. जशी ज्याची कर्मगती, तशी ती त्याच्या डोक्यात बसेल. म्हणून सांगितलेले सत्य आहे.

मी आहे, त्याला आहे ! नाही त्याला नाही ! म्हणूनच कृष्णावतारात उलटे सुलटे खेळ खेळावे लागले. दोन्ही पक्षाच्या हृदयात मीच होतो. पण बुद्धी भ्रम झाल्यानंतर, दृष्टांचा क्षय करण्याचा प्रयत्न होतो. मग कोण कोणाला मारतो? मी जरी त्यांच्या हृदयी असलो, मग माझा मीच मृत झालो असे म्हणावे काय?

अहंकाराने बरबटलेला हा आकार अघोर मार्गी जातो. त्यात भीष्म तल्लीन झाले होते. पण भीष्माला, द्रोणाचार्याला धीर देऊन हे कर्तव्य झाले आहेच नां? म्हणून अखंड सत् – त्यांच्या चरणात जो निमग्न आहे, मग तो भले जरी मायावीत असला, तरी तो काही वेळ सद्गुरु चरणांची आठवण करतो. त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी करावे लागते. तेव्हा सेवेकऱ्यांनी संशय रहित होण्याचा प्रयत्न करा.

मी आकाराच्या रहित नाही, माझा अंत कोणीही घेऊ शकत नाही. मी कुठे प्रगट होईन, कुठे नाही हे कोणासही कळणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page