श्री समर्थ मालिक – अखंड तत्व कोठे आहे? त्याचा वावर कोठे आहे? हे आपणाला कळलेच असेल. सेवेकऱ्यांनो ठाम श्रद्धा, अढळ विश्वास, दृढ: निश्चय असल्यास सर्वस्व होते. डळमळीत असल्यास काहिही होणार नाही. म्हणून ठाम व अखंड श्रद्धा ठेवा. वाट भुलता कामाची नाही. हे सेवेकर्यांनी ओळखले पाहिजे. त्या ठिकाणी काहींची मनोभावना आहे, पूर्वी होते पण आता काही नाही. पण या ठिकाणी हे ठाम आहेत. याची कल्पना इतर मानवांना नाही. आजच्या या बोलावरून काय आहे ते पहा अन् त्याप्रमाणे वाटचाल करा. भुलू नका. शंका धरू नका. सत् भक्तीला ऋध्दी सिद्धी, तंत्र मंत्र काही लागत नाही. जादूटोण्याची आवश्यकता नाही. आले आले अन् गेले गेले हे सत् भक्तीत नाही. नजरबंदीचे खेळ नाहीत. अघोर मानवाच्या कर्तव्याचे फळ अस्थिर असते. तेच त्यांना मिळते. पुढे काय करायचे ते व्यापक शक्तीच करते. ते मानवांच्या हातात नाही.
सेवेकऱ्यांनो, हे तुमचे अखंड नाम अमृता सारखे आहे, ते टिकविण्याचा प्रयत्न करा. हेच माझे संदेश आहेत. पूर्वीप्रमाणे आता कस नाही. अहंकार हा आज ना उद्या मला खतम करावाच लागतो. क्रोधाला मारावयाचे, एका क्षणात मारू शकतो, पण त्याच्या पायऱ्या आहेत. मानव अहंकाराने बरबटला तर तोच अहंकार त्याला मृत्यूच्या खाईत लोटतो. लोटला जातो. ते कसे होते, तर करून घ्यावे लागते. करून घेतल्यानंतर तो आपोआप त्याखाईत लोटला जातो. ©️
