Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

सत कर्तव्याने वाटचाल करा…©️

सत कर्तव्याने वाटचाल करा…©️

श्री समर्थ मालिक – एका सेवेकऱ्याचे पत्राद्वारे संदेश काय येतात, त्याला तुम्ही हसता हे बरोबर दिसते का? एखाद्याला वाईट वाटेल असे बोलता, कधी कुणी चेष्टा-मस्करी करतात, कधी कधी कुणी पायरी सोडून वागतात हे कितपत योग्य आहे? ह्याचा विचार करा.

आसन जागे नाही झोपले आहे असे आपण समजता का? हा दरबार हसण्याचा आहे का? हसत होता मग मुख्य ज्योतीने रोखले का नाही? ज्या सद्गुरुंना तुम्ही शरण आहात, ते आपमतलबी आहेत का? मग का हसलात? ही प्रेम सूत्राची दोरी कोण कुणीकडे नेतो? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे ! 

अशा या सेवेकऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही. इतकेच मला सांगावयाचे, की सत कर्तव्याने जी ज्योत जाईल तिच फळ चाखील. जी जाणार नाही, त्याच्या सारखा अभागी तोच ! मला या सेवेकऱ्यांबद्दल नाराजी वाटते. छाया काढून घेतली तर मग समजेल काय ते ! मग काहीच राहणार नाही. कोठे काय होईल हेच कळणार नाही. सेवेकरी फार मायावी आहेत असे आम्ही म्हणावे कां? ©️

You cannot copy content of this page