श्री समर्थ मालिक – सेवेकरी दिलेल्या ज्ञानात तल्लीन असतात काय? ज्ञान बहाल केलेले आहे. त्याचा उजाळा करू लागला तर वेळ प्रसंग येथील तेव्हा स्वतः सेवेकरी सत कृतिमान होऊन दूर हटवू शकेल. सेवेकरी हा शंकेत आहे कि शंकेच्या रहित आहे? म्हणजे अजून त्यांनी सद्गुरु व सत ओळखले असे म्हणावे की नाही? तुमच्या मायेसाठी, सुखदुःखांसाठी सत् आहे, पण भोगत्व कोणी भोगायचे? याच्यातून पार पडणे भाग आहे.
आसनाच्या सानिध्यात कोणी कोणाला हसणे यथायोग्य स्थिती आहे कां ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. मग जे ज्ञान दिले, त्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने घेतला आहे का? ज्ञान, उपयोग व जपणूक ठेवली आहे काय? पालन चांगल्या तऱ्हेने का केले नाही? सानिध्यात, कर्मसंचितामध्ये ज्ञान जपणूक करता येत नाही, नाते श्रेष्ठ व पवित्र राखू शकले नाहीत मग माझा नाईलाज आहे. आसना सानिध्यात असे वागावे, असे राहावे हे प्रत्येकाने समजले पाहिजे. ह्या स्थानाचे भान राखून, औचित्य राखून, महात्म्य राखून, स्थानात धीरगंभीरपणे, शांत चित्ताने राहावयास पाहिजे, नाहीतर ज्याचा तोच जबाबदार, ज्याचा तोच प्रारब्ध कर्ता. आपले संचित आपणच घडवायचे आणि आपणच भोगायचे. आपणास यातून सोडविण्यास कुणीही येणार नाही हे लक्षात ठेवा. ©️
