सद्गुरु बाबा : शेषावर पहुडले आहेत ते कोण? (क्षिराब्धी)
अलक : ज्याप्रमाणे आम्ही अन ॐकारेश्वर (निराकार आणि आकार); त्याप्रमाणे ॐकारेश्वर अन क्षिराब्धी; त्यानंतर त्रिगुण अन तिन्ही शक्ती. (येथे आम्ही म्हणजे अलक – सत्! अलकांपासून (निराकारा पासून) ॐकार ! आणि ॐकारांपासून ॐकारेश्वर म्हणजेच आकार ! ह्याचाच अर्थ निराकारा नंतर आकार !) ॐकारेश्वरांनी कर्तव्यासाठी निर्माण केले क्षिराब्धी !
सद्गुरु बाबा : ॐकारेश्वर अन क्षिराब्धी एकच का?
अलक : नाही. ॐकारेश्वरांनी ……..त्यांना निर्माण केले आहे.
सद्गुरु बाबा: कशासाठी?
अलक : आद्य युगात मानव अन दानव यात युद्ध चालू होते. आता हे कर्तव्य करायचे कोणी? यासाठी ते निर्माण केले. आम्ही त्यांना निर्मिले (सत्) अन त्यांनाही (अ-सत) निर्मले. एक, अति बलाढ्य झाले (अ-सत). एक, ज्यांनी निर्माण केले त्यांची जाण राखून कर्तव्य करीत होते (सत्).
आम्हास विचारणा केली, पुढील कर्तव्य कसे घ्यायचे. यावर आम्ही सांगितले एक तत्त्व निर्माण करणे. (अलकानीच निर्माण केले) त्याला आकार द्या. त्याप्रमाणे कर्तव्य परायण होईल. पण ते कर्तव्य करता करता एका महासाध्वीच्या (वृंदा) शापात अडकून राहिले. पुढे आपणास सर्वस्व माहित आहे. ©️
