Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

संवाद…अलकांशी-२ ©️

संवाद…अलकांशी-२ ©️

सद्गुरु बाबा : शेषावर पहुडले आहेत ते कोण? (क्षिराब्धी)

अलक : ज्याप्रमाणे आम्ही अन ॐकारेश्वर (निराकार आणि आकार); त्याप्रमाणे ॐकारेश्वर अन क्षिराब्धी; त्यानंतर त्रिगुण अन तिन्ही शक्ती. (येथे आम्ही म्हणजे अलक – सत्! अलकांपासून (निराकारा पासून) ॐकार ! आणि ॐकारांपासून ॐकारेश्वर म्हणजेच आकार ! ह्याचाच अर्थ निराकारा नंतर आकार !) ॐकारेश्वरांनी कर्तव्यासाठी निर्माण केले क्षिराब्धी !

सद्गुरु बाबा : ॐकारेश्वर अन क्षिराब्धी एकच का?

अलक : नाही. ॐकारेश्वरांनी ……..त्यांना निर्माण केले आहे.

सद्गुरु बाबा: कशासाठी?

अलक : आद्य युगात मानव अन दानव यात युद्ध चालू होते. आता हे कर्तव्य करायचे कोणी? यासाठी ते निर्माण केले. आम्ही त्यांना निर्मिले (सत्) अन त्यांनाही (अ-सत) निर्मले. एक, अति बलाढ्य झाले (अ-सत). एक, ज्यांनी निर्माण केले त्यांची जाण राखून कर्तव्य करीत होते (सत्).

आम्हास विचारणा केली, पुढील कर्तव्य कसे घ्यायचे. यावर आम्ही सांगितले एक तत्त्व निर्माण करणे. (अलकानीच निर्माण केले) त्याला आकार द्या. त्याप्रमाणे कर्तव्य परायण होईल. पण ते कर्तव्य करता करता एका महासाध्वीच्या (वृंदा) शापात अडकून राहिले. पुढे आपणास सर्वस्व माहित आहे. ©️

You cannot copy content of this page