श्री समर्थ मालिक –
संत मालिकेत संतांनी सांगितले आहे, अनुभवले आहे. तुम्ही ते अनुभवले नाही. व्यक्तिशः आपणास नाही, सर्व सेवेकर्यांना आहे. संताने वाक्यरचना केलेली आहे. हल्लीचा काळ वेगळा आहे. सताला त्रास होतो आहे, दिसत आहे, गती मिळत आहे. संताने त्रास सहन करणे व तो त्रास सहन करता करता सतमय बनने. मग त्रास पूर्ण झाल्यानंतर फळ आपोआप मिळत असते.
अघोरांचा त्रास केव्हा व कसा होत असतो, तर अघोर कृती व असत कर्तव्याचा लोंढा डोक्यावरून जाऊ लागल्यानंतर होत असतो. मग कर्तव्य करण्यास वेळ लागत नाही. त्याचा नाश कृतीने होत असतो. हा इतिहास आदिअंता पासूनचा आहे.
मायावी कर्तव्यामध्ये त्रिगुणांनी आडकाठी व खो घातला असेल, तरी देखील सताजवळ, क्षणोक्षणी त्रिगुण निर्माण करण्याची शक्ती आहे. सताजवळ सहनशीलता असते. त्रिगुणांनी दिलेले अधिकार व त्याचा उपभोग अघोरांनी आत्तापर्यंत घेतला आहे. ©️
