श्री समर्थ मालिक –
जी मूळ माया तिचे व माझे बोलणे होत होते. तिला अनेक वेळा समजावून सांगितले. तो तुझे ऐकणार नाही. तुझ्या सानिध्यात येणार नाही, पण अधिकार बहाल केले ना! त्याचे जोरावर ती म्हणाली, मी पाहते तो कसा फसत नाही. मी म्हटले पहा! पण मी जे करावयाचे ते केले. आपण तिच्या आधीन गेला नाहीत. आपणास पूर्णत्वाने खात्री होती माझे मालिक मला डावलणार नाहीत. माया देऊन देऊन तरी काय देणार? पण जे कधी हटत नाही, तुटत नाही, ही संपत्ती मायेजवळ नाही. तिला कोणीही हिरावून घेणार नाही. ती अदृश्य संपत्ती मालिकच देत असतात.
ही काय देणार आहे म्हणून तिला हार घ्यावी लागली. मला एवढेच सांगायचे की माझी अन तिची जीत लागली होती. पण आपणास त्रास होऊ दिला नाही. सांगून जी ज्योत ऐकत नाही म्हणून तिला सांगितले. दिलेले अधिकार तिला गाजवायचे होते, पण ते कुठे गाजवायचे हे तिला माहीत नाही. पण अखेर ती शरण आली ना? सेवेकरी त्या पात्रतेचा असेल तर तो आपोआप सावध होतो.
मी झोपडीत का असतो? सेवेकरी दिसायला लाचार दिसतो, पण त्याचे घरी मी का असतो? कारण ती ज्योत भक्तीयुक्त असते. आता स्वर्ग म्हणजे काय? इंद्र सभा म्हणजे स्वर्ग की काय? सद्गुरु सानिध्यात, चरणात लीन होणे हाच स्वर्ग आहे. २१ स्वर्ग या तीन ताळामध्येच आहे. ते नंतर सांगेन.©️
