Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

…..हाच स्वर्ग आहे ! ©️

…..हाच स्वर्ग आहे ! ©️

श्री समर्थ मालिक

       जी मूळ माया तिचे व माझे बोलणे होत होते. तिला अनेक वेळा समजावून सांगितले. तो तुझे ऐकणार नाही. तुझ्या सानिध्यात येणार नाही, पण अधिकार बहाल केले ना! त्याचे जोरावर ती म्हणाली, मी पाहते तो कसा फसत नाही. मी म्हटले पहा! पण मी जे करावयाचे ते केले. आपण तिच्या आधीन गेला नाहीत. आपणास पूर्णत्वाने खात्री होती माझे मालिक मला डावलणार नाहीत. माया देऊन देऊन तरी काय देणार? पण जे कधी हटत नाही, तुटत नाही, ही संपत्ती मायेजवळ नाही. तिला कोणीही हिरावून घेणार नाही. ती अदृश्य संपत्ती मालिकच देत असतात.

ही काय देणार आहे म्हणून तिला हार घ्यावी लागली. मला एवढेच सांगायचे की माझी अन तिची जीत लागली होती. पण आपणास त्रास होऊ दिला नाही. सांगून जी ज्योत ऐकत नाही म्हणून तिला सांगितले. दिलेले अधिकार तिला गाजवायचे होते, पण ते कुठे गाजवायचे हे तिला माहीत नाही. पण अखेर ती शरण आली ना? सेवेकरी त्या पात्रतेचा असेल तर तो आपोआप सावध होतो.

मी झोपडीत का असतो? सेवेकरी दिसायला लाचार दिसतो, पण त्याचे घरी मी का असतो? कारण ती ज्योत भक्तीयुक्त असते. आता स्वर्ग म्हणजे काय? इंद्र सभा म्हणजे स्वर्ग की काय? सद्गुरु सानिध्यात, चरणात लीन होणे हाच स्वर्ग आहे. २१ स्वर्ग या तीन ताळामध्येच आहे. ते नंतर सांगेन.©️

You cannot copy content of this page