Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

तर कोण कोणाची विटंबना करेल काय? ©️

तर कोण कोणाची विटंबना करेल काय? ©️

श्री समर्थ मालिक – बोलताना सेवेकरी बोलतो, “असे वाटते” अन् यावर चर्चा चालते. एकाने एकपट बोलले, तर दुसरा दसपट बोलतो. काही सेवेकरी अहंकारी आहेत.

अहंकार शुद्ध सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करा.

सेवेकऱ्यांने असे म्हटले पाहिजे, मी तुझा आहे, तू माझा आहे. आपला जन्मदाता एकच आहे. याप्रमाणे चला म्हणजे वाद निर्माण होणार नाहीत. याप्रमाणे वाटचाल करा. मग शांती सुख लवकर सापडेल. मोक्षाची वाट अलीकडे येईल. मग माया इकडे तिकडे हलू शकणार नाही. पण हे केव्हा अन् कधी होईल, तर सद्गुरु नामात तल्लीन होण्याचा प्रयत्न केला तर होईल. तरंग आले तर आठवण करा. मी कोणाशी वादविवाद करतो, कोणाची मस्करी करतो, सेवेकर्‍यांनी हे विसरून जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपुलकी लवकर निर्माण होईल.

आसनाधिस्तांनी कोडकौतुकाने सांगितले आहे. सर्व माझेच आहेत आणि मी सर्वांचा आहे. अशा तऱ्हेने कर्तव्य केले, तर कोण कोणाची विटंबना करेल काय? म्हणून मन मिळावूपणाने सेवेकऱ्याने वागावे. मन स्फटिका सारखे ठेवणे म्हणजे त्या ठिकाणी द्वैत भावना निर्माण होणार नाही. अशा तऱ्हेने वाटचाल करणे. 

आज पर्यंत काही सेवेकऱ्यांची मनमिळाऊपणे वाटचाल झालेली आहे. सेवेकऱ्यांचा प्रश्न आहे, मग कर्तव्य सेवेकऱ्याचे असो अगर त्याच्या मुलाचे असो, मायावी तऱ्हेने सेवेकऱ्याने जे कर्तव्य करावयाचे असते, ते करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही सेवेकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये.

मात्र इतकेच आहे, दरबारातील सेवेकरी कोणीतरी जाणारच ! हजर राहणारच ! त्यातच त्याने समाधान मानावे. प्रत्येक सेवेकर्‍याच्या कर्तव्याला सर्वच सेवेकरी हजर होतील असे काही सांगता येत नाही. सेवेकऱ्यांपैकी कोणीतरी ज्यांना सवड असेल, त्यांनी हजर राहण्याचा प्रयत्न करा. कर्तव्याला जागृत राहणे हे संदेश आहेत. कर्तव्य काय आणि कोणते? तर या जन्मी ‌ काय केले पाहिजे, याची शोधन आपणच केले पाहिजे. सत करायचे ते याच जन्मी करा. म्हणून जे करावयाचे ते आत्ताच करा. आचरणात आणा. जे सांगितले ते बोल लक्षात ठेवून सारखे गिरवीत राहणे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page