मानवी सेवेकरी गृहस्थाश्रमी आहेत. मायावीत गुरफटलेले आहेत. माया ही सत पण आहे आणि असत पण आहे. सत मायेने गेल्यानंतर सत पदाला जातो. सत मायने वाटचाल केल्यानंतर अंतर्यामीने प्रेरणा दिली की तो पाहतो. हे साधल्यावर तन मन धन ही तिन्ही अंगे अर्पण करावी लागतात. तुमच्या भक्ती प्रमाणे जे रुजू करावयाचे, तोच हा महान दिवस आहे. ज्यांना साधले, सापडले, कळले ते महान सेवेकरी धन्य होत.
आजचे गुरुपद महान श्रेष्ठ पदाचे आहे.अनंत अवतार झाले. कार्याची सिद्धता साधली, पण आजचा हा दिवस न्यायदानाचा आहे. न्याय हक्काचा आहे. हे आसन न्यायदानाचे, सतपदाचे आसन आहे. हा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी सेवेकरी फार जपत असतात. या शुभ दिनी सद्गुरु मुखातून जे बोल निघतात, ते झेलण्यासाठी सेवेकरी धावत असतात. पण अखंड न्यायदानाचे आसन आणि त्या न्यायदानाच्या आसनावरच्या न्यायाला फार महत्त्व आहे. यावरूनच पुढच्या आढाव्याची गती घ्यावयाची असते. सर्वस्व गतीचा आराखडा याच शुभ दिनी तयार करण्यात येतो. वाल्मीकीने रामायण याच शुभदिनी रचिले. महाभारत सुद्धा याच शुभदिनी रचले म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजच्या या शुभदिनी जे महान बोल मिळाले, ते जतन करून ठेवणे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. (समाप्त) ©️
