Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

त्रिवेणी संगम ©️

त्रिवेणी संगम ©️

लिनता, नम्रता आणि शांती या त्रिवेणी संगमात सेवेकरी आंघोळ करील तर तो सेवेकरी चुकणार नाही. या त्रिवेणी संगमातील आंघोळीचा अभाव म्हणून सेवेकरी चुकतो.

सेवेकऱ्यांना माहीत असताना, आदेश दिले असताना, जर चूक केली, तर जाणून बुजून चुक केली असे होईल. समर्थांच्या कर्तव्याकडे मात्र सेवेकऱ्यांना लक्ष ठेवता येते, पण आदेशाप्रमाणे, संदेशाप्रमाणे कर्तव्य करता येत नाही. कर्तव्य होत नाही. मग अशा सेवेकऱ्यांना काय करावे? म्हणून जो सत् भक्तीला लागला, सत् कर्तव्याला लागला अशा सेवेकऱ्याने सर्वस्व लक्ष आपल्या सत् कार्यावर ठेवून सत् भक्तीत रममाण होऊन, आपले लक्ष इकडे तिकडे न टाकता, आपले पाऊल इकडे तिकडे ढकलता कामा नये. संदेश डावलता कामा नये. आदेशाची हेळसांड करता कामा नये. कर्तव्याची टंगळ मंगळ करता कामा नये. संदेशाचे, आदेशाचे महत्त्व सांगितले आहे त्याप्रमाणे वागणे. ते आचरणात आणणे, हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page