Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

अढळ श्रध्देचे फळ…..मालिक (२) ©️

अढळ श्रध्देचे फळ…..मालिक (२) ©️

भक्ती करणे दुरापास्त आहे. ती कोणाला ठसली जात नाही. ठसली तरी अडीअडचणी निर्माण होतात. पण पूर्वजन्मीचे गाठोडे असेल तर तो त्याची पर्वा करीत नाही. आपली चाकोरी सोडत नाही.

हल्लीच्या परिस्थितीत गती मिळणे, चाकोरी मिळणे दुरापास्त झाले आहे. आयुष्य घालवेल पण सत्य परिस्थिती बाजूला राहीली.

आपल्या येथे अजमावले जाते, सांगितले जाते, तसे कुठेही सांगितले जात नाही. येथे बिलगलेल्या ज्योती भाग्यवान आहेत. पूर्व प्रारब्धानुसार सत् सानिध्य मिळाले आहे. ते टिकविणे सेवेकऱ्याच्या कर्तव्यावर अवलंबून आहे.

मनुष्याचे जीवन जगणे हल्लीच्या परिस्थितीत फार कठीण आहे. नसेल ते विघ्न उभे राहते. तशातून सेवेकऱ्याला अडीअडचणी बाजूला करून वेळ गाठावी लागते. तात्पर्य – ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्याला त्याला मिळते. जशी सेवेकऱ्यांची ओढण, जशी वाटचाल त्याप्रमाणे त्याला फळ द्यावे लागते. मात्र फळाच्या आशेने जो सेवेकरी असतो, तो मात्र आपल्या भांडवलाला मुकला जातो. आशा न धरता निष्काम भावनेने सेवा केली तर मालिक कोड कौतुक पूरवितात. म्हणून आशेने कोणतीही गोष्ट करू नये असे सांगितले जाते. (समाप्त)©️

You cannot copy content of this page