Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अढळ श्रध्देचे फळ…..मालिक (२) ©️

अढळ श्रध्देचे फळ…..मालिक (२) ©️

भक्ती करणे दुरापास्त आहे. ती कोणाला ठसली जात नाही. ठसली तरी अडीअडचणी निर्माण होतात. पण पूर्वजन्मीचे गाठोडे असेल तर तो त्याची पर्वा करीत नाही. आपली चाकोरी सोडत नाही.

हल्लीच्या परिस्थितीत गती मिळणे, चाकोरी मिळणे दुरापास्त झाले आहे. आयुष्य घालवेल पण सत्य परिस्थिती बाजूला राहीली.

आपल्या येथे अजमावले जाते, सांगितले जाते, तसे कुठेही सांगितले जात नाही. येथे बिलगलेल्या ज्योती भाग्यवान आहेत. पूर्व प्रारब्धानुसार सत् सानिध्य मिळाले आहे. ते टिकविणे सेवेकऱ्याच्या कर्तव्यावर अवलंबून आहे.

मनुष्याचे जीवन जगणे हल्लीच्या परिस्थितीत फार कठीण आहे. नसेल ते विघ्न उभे राहते. तशातून सेवेकऱ्याला अडीअडचणी बाजूला करून वेळ गाठावी लागते. तात्पर्य – ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्याला त्याला मिळते. जशी सेवेकऱ्यांची ओढण, जशी वाटचाल त्याप्रमाणे त्याला फळ द्यावे लागते. मात्र फळाच्या आशेने जो सेवेकरी असतो, तो मात्र आपल्या भांडवलाला मुकला जातो. आशा न धरता निष्काम भावनेने सेवा केली तर मालिक कोड कौतुक पूरवितात. म्हणून आशेने कोणतीही गोष्ट करू नये असे सांगितले जाते. (समाप्त)©️

You cannot copy content of this page