Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मंत्र सिद्धी – गोरक्षनाथ ©️

मंत्र सिद्धी – गोरक्षनाथ ©️

“मंत्र म्हणजे मन त्रयीत लय करणे – येणे नाम मंत्र !” मन त्रयीत लय झाले म्हणजे मंत्राची सिध्दी होते. पण त्यालाही समर्थांचे सहाय्य लागते. सद्गुरू शिवाय मन त्रयीत लय करणारे कोणीही नाही. मन त्रयीत लय झाले तरच ते सिध्द होते. त्याला ओंकार बीज लागते. त्याशिवाय मंत्राची पूर्ती नाही.

मंत्र म्हणजे काय? त्याचे माहेरघर हेच समर्थ माऊली आहेत. ओंकार बीज लावल्याशिवाय कोणता तरी मंत्र आहे का? आज एकाच गणपतीची किती नांवे आहेत. तोच गणपती किती रूपाने नटलेला आहे. त्याच्या ध्यानात निमग्न राहण्याची आमची इच्छा आहे.

या ऋद्धी सिद्धीने मला अभिमान वाटला होता. त्यामुळे माझे नुकसान मी करून घेतले. तरी येथून पुढे आपण मला याबाबतीत डिवचू नये ही विनंती आहे. सत् सानिध्याची ओळख असताना सुद्धा या ऋद्धी सिद्धी मुळे मला अहंकार निर्माण झाला. त्यामुळे सताची ओळख विसरून वितंड वाद निर्माण झाला. मग मला प:श्चाताप झाला. नंतर मी माझ्या समर्थांचे ध्यान केल्यानंतर स्थिर झालो. मन हे कोणत्या खड्ड्यात घालील याचा अंत नाही. सताचे सानिध्य असताना मंत्राच्या नादी लागले तर वहावत जातो. मी वहावलो. पण त्यानी मला ठिकाणावर आणले. (पुढे सुरु…..२)©️

You cannot copy content of this page