Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

मंत्र सिद्धी – गोरक्षनाथ ©️

मंत्र सिद्धी – गोरक्षनाथ ©️

“मंत्र म्हणजे मन त्रयीत लय करणे – येणे नाम मंत्र !” मन त्रयीत लय झाले म्हणजे मंत्राची सिध्दी होते. पण त्यालाही समर्थांचे सहाय्य लागते. सद्गुरू शिवाय मन त्रयीत लय करणारे कोणीही नाही. मन त्रयीत लय झाले तरच ते सिध्द होते. त्याला ओंकार बीज लागते. त्याशिवाय मंत्राची पूर्ती नाही.

मंत्र म्हणजे काय? त्याचे माहेरघर हेच समर्थ माऊली आहेत. ओंकार बीज लावल्याशिवाय कोणता तरी मंत्र आहे का? आज एकाच गणपतीची किती नांवे आहेत. तोच गणपती किती रूपाने नटलेला आहे. त्याच्या ध्यानात निमग्न राहण्याची आमची इच्छा आहे.

या ऋद्धी सिद्धीने मला अभिमान वाटला होता. त्यामुळे माझे नुकसान मी करून घेतले. तरी येथून पुढे आपण मला याबाबतीत डिवचू नये ही विनंती आहे. सत् सानिध्याची ओळख असताना सुद्धा या ऋद्धी सिद्धी मुळे मला अहंकार निर्माण झाला. त्यामुळे सताची ओळख विसरून वितंड वाद निर्माण झाला. मग मला प:श्चाताप झाला. नंतर मी माझ्या समर्थांचे ध्यान केल्यानंतर स्थिर झालो. मन हे कोणत्या खड्ड्यात घालील याचा अंत नाही. सताचे सानिध्य असताना मंत्राच्या नादी लागले तर वहावत जातो. मी वहावलो. पण त्यानी मला ठिकाणावर आणले. (पुढे सुरु…..२)©️

You cannot copy content of this page