Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

स्वयंभू ! ©️

स्वयंभू ! ©️

बाबा, मालकांना विचारणा करतांना म्हणतात, “आमच्याही पेक्षा खरा शिव न्यारा आहे. ते कसे? आम्हाला थोडेसे सांगा ! 

समर्थ म्हणतात, “स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी आहे. स्वयंभू हे भोळे आहेत. त्यांची कोणी भक्ती केली किंवा काहीं विचारलं सवरलं म्हणजे ते झटदिशी वचन देतात. त्यांना मागचा पुढचा विचार नाही. ते नेहमी ध्यानस्थ बसलेलें असतात. त्याला मानव तप या नावाने ओळखतात. स्वयंभूच्या तपाचा कोणी भंग केला म्हणजे ते झटदिशी शाप देतात, परंतु स्वयंभूना विचार नाही. जरी त्यांचे भक्त असले तरीही ते त्यावेळी ओळखत नाहीत. लगेच तिसरा नेत्र उघडून शाप देतात. मग त्या शापाचे काय होते ते स्वयंभू ना कळत नाही.मानव त्यांना भोलेनाथ म्हणतात. स्वयंभूची भक्ती करणारे व इच्छा तृप्त करुन घेणारे, असे या जगात जवळ जवळ १७ टक्के लोक आहेत. परंतु त्यांची जाणीव त्या मानवाना नसते. 

स्वयंभु ना निर्माण करणारा कोणीतरी आहे. परंतु मानव कबुल करु शकत नाहीत. स्वयंभू झटदिशी वचन देतात. इच्छा तृप्त करतात, म्हणून त्या मानवाना वाटते की स्वयंभू हेच साक्षात ईश्वर आहेत. परंतु त्यांची जाणीव घेणारे या जगात थोडे आहेत. काही उलट तंगड्या करणारे पण थोडे आहेत. स्वयंभू आले त्या वेळी सेवेकऱ्यांनी जाणीव घेतली होती का? स्वयंभू बरोबर कोण आले होते? (आपणच) आणखी कोण आले होते? ©️

You cannot copy content of this page