Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

समर्पण – श्री समर्थ ©️

समर्पण – श्री समर्थ ©️

आपण सेवेकरी आहोत. आपण किंवा इतर मानव ज्योती काय करणार आहोत? सेवेकऱ्यांने एकच अर्पण करावयाचे, जी अखंड भक्ती, तिच मालकांच्या चरणांवर ऋजू होते. दुसरे काय अर्पण करणार? मालिक कशाला भुकेलेले आहेत? एकच अखंड नाम! सत् भक्ती तिच करावयाची असते.

आपले सेवेकरी काय म्हणतात, “मी सर्वस्व अर्पण केले आहे!” असे जर आहे, तर सांगण्यास तरी काय आधार आहे? आपण अर्पण कोणाला करतो? अर्पण करणारे कोण? मालकांना एकच अर्पण करावयाचे – सत् भक्ती! नामात दंग, सत् चाकोरी, सत् वळणे अंगी पडतील, तेच पुष्कळ आहे.

सत म्हणजे काय?

याचाच ठाव घ्यायचा आहे. सत सतात लय झाल्यानंतर बाकी शिल्लक राहिल काय? असे मनाने ठाम, शुद्ध होण्यासाठी एकच उपाय! जे नाम त्याचा उजाळा करावयाचा असतो. त्यामुळे सर्वस्व भावना, नाहीशा होतील. जे ऐकता, जी वळणे, जे कार्य, हुकुम, आदेश त्याप्रमाणे वागावयाचे! एवढेच ज्योतीला माहीत असते. त्याप्रमाणे वागणे. सताचा पाया मजबूत असेल, तर भिती नाही. मजबूत नसेल तर ती ज्योत घसरते.

ध्यानधारणा, नामस्मरण करताना एकच करायचे, असत वातावरण नाहीसे करुन, शुद्ध व्हावयाचे असते. (पुढे सुरु…..२) ©️

You cannot copy content of this page