Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

संदेश – मालिक – ©️

संदेश – मालिक – ©️

श्री समर्थ मालिक –

एकदा सेवेकरी झाला की सेवेकऱ्याचे घर हा सद्गुरु आश्रम आहे.

कृती तशी फळे हा सिद्धांत आहे. सद्गुरु अंत:र्यामी असतात, पण कर्तव्य हे मन करीत असते. मनाचे अनुरोधाने केलेले कर्तव्य हेच कर्मसंचित आहे. तन, मन, धन अर्पण केल्यानंतर जे अविनाशी राहातात, तेच शिल्लक असतात. तेच अक्षय, अखंड आहेत. तेच सेवेकऱ्यांनी जतन करावयाचे असते.

सेवेकऱ्यांने स्वतःचा अनुभव स्वतःच घ्यायचा असतो. अनुभव घेत जे सिद्धत्व, तेच सत असते. सेवेकर्‍यांनी द्वैतभावना घ्यावयाची नाही.

सेवेकऱ्यांना शुद्धीवर आणण्याचा अधिकार सद्गुरूंचा आहे, सेवेकऱ्यांचा नाही. (कारण सेवेकरी हे सताचे सेवेकरी आहेत, कोण्या मानवाचे ते सेवेकरी नाहीत.) सताचे सेवेकरी हे सद्गुरूंच्या कुटुंबातील गुरुबंधू भगिनीं होत, म्हणून त्यांनी गुरुबंधू भगिनी सारखेच राहावे, सद्गुरुंचे अधिकार आपल्या हातात घेऊ नयेत.©️

You cannot copy content of this page