Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक प्रवचन (३) ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन (३) ©️

मानव हा मायेत गुरफटलेला आहे. त्यातून सुटका कशी होईल हे समजण्यासाठीच या दरबारची निर्मिती आहे.

चार दिशेला चार दरबार आहेत. अशा तऱ्हेचा उत्सव अनेक ठिकाणी आज होत आहे. परंतु हा स्वयं दरबार आहे. या ठिकाणी एक क्षण का होईना, प्रयत्न करने हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी अखंड तत्व प्रगट आहे. ते प्रगट आहे किंवा नाही, ह्याची प्रत्येकाने पाहणी करावी आणि ज्यांनी या तत्वाची जाण घेतली तेच खरे सत् शिष्य ! तेच खरे सत् भक्त होत !

या ठिकाणच्या तत्वाची, येथील घडामोडींची जाणिव घेण्याचा प्रयत्न करा. हा स्वयं दरबार आहे. चार दरबारचे सेवेकरी या ठिकाणी सूक्ष्माने आले आहेत. ते पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी प्रत्येक मानवाने धडपड केली पाहिजे. या ठिकाणी काय चालले आहे, ह्याची एका क्षणाकरीता का होईना जाण घेणे हेच मानवाच्या मुख्य कर्तव्याचे मुख्य अंग आहे. आपण कोण ह्याची जाणीव घेणे, स्वस्वरुप दर्शन घेणे आणि त्याचबरोबर आपल्या आद्य कर्तव्याची जाणीव ठेवून सद्गुरु चरणांत रममाण होणे, त्यांच्याच स्वरूपात लय होणे. अशा तऱ्हेने पायरी पायरीने त्यांच्या ठिकाणी तेच नेऊन पोहचवितात. त्यांच्या कृपेशिवाय, त्यांच्या सानिध्याशिवाय त्यांच्या ठिकाणी कोणीही जावू शकणार नाही. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page