Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

श्री समर्थ मालिक प्रवचन (३) ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन (३) ©️

मानव हा मायेत गुरफटलेला आहे. त्यातून सुटका कशी होईल हे समजण्यासाठीच या दरबारची निर्मिती आहे.

चार दिशेला चार दरबार आहेत. अशा तऱ्हेचा उत्सव अनेक ठिकाणी आज होत आहे. परंतु हा स्वयं दरबार आहे. या ठिकाणी एक क्षण का होईना, प्रयत्न करने हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी अखंड तत्व प्रगट आहे. ते प्रगट आहे किंवा नाही, ह्याची प्रत्येकाने पाहणी करावी आणि ज्यांनी या तत्वाची जाण घेतली तेच खरे सत् शिष्य ! तेच खरे सत् भक्त होत !

या ठिकाणच्या तत्वाची, येथील घडामोडींची जाणिव घेण्याचा प्रयत्न करा. हा स्वयं दरबार आहे. चार दरबारचे सेवेकरी या ठिकाणी सूक्ष्माने आले आहेत. ते पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी प्रत्येक मानवाने धडपड केली पाहिजे. या ठिकाणी काय चालले आहे, ह्याची एका क्षणाकरीता का होईना जाण घेणे हेच मानवाच्या मुख्य कर्तव्याचे मुख्य अंग आहे. आपण कोण ह्याची जाणीव घेणे, स्वस्वरुप दर्शन घेणे आणि त्याचबरोबर आपल्या आद्य कर्तव्याची जाणीव ठेवून सद्गुरु चरणांत रममाण होणे, त्यांच्याच स्वरूपात लय होणे. अशा तऱ्हेने पायरी पायरीने त्यांच्या ठिकाणी तेच नेऊन पोहचवितात. त्यांच्या कृपेशिवाय, त्यांच्या सानिध्याशिवाय त्यांच्या ठिकाणी कोणीही जावू शकणार नाही. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page